Solapur News : बार्शीत आई-वडिलांसोबत आंदोलन करणाऱ्या दिव्यांग भावंडांचा मृत्यू, एकाच घरातील दोन्ही अपत्यांचा दुर्दैवी अंत
Solapur News : दिव्यांग निधीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात दुसऱ्या मुलाचा देखील मृत्यू बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात आंदोलनादरम्यान दिव्यांग मुलाचा मृत्यूमागील तीन महिन्यापूर्वी याच आंदोलनात दिव्यांग मुलीचा देखील झाला होता मृत्यू
Solapur News : दिव्यांग (Divyang) निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूरमधील (Solapur) बार्शीतल्या (Barshi) चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे रामचंद्र कुरुळे यांच्या 10 वर्षीय मुलाचा देखील या आंदोलनात मृत्यू झाला आहे. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय (Divyang Mantralaya) स्थापन करण्याची घोषणा झाली असतानाच दोन दिव्यांग मुलांचा निधीसाठी आंदोलन करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिव्यांग बांधावासाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. निधी मिळावा म्हणून 18 ऑगस्टपासून गावातच उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते. या आंदोलनात अल्पवयीन मुलगी वैष्णवी कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. वैष्णवी हिच्या दुर्दैवी निधनानंतर संबंधितांवर कारवाई करु, तसेच निधी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर आंदोलन स्थगित करुन कुरुळे कुटुंबियांनी वैष्णवीच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले होते.
आंदोलनात आधी मुलीला गमावलं, आता मुलाचाही मृत्यू
मात्र तीन महिने उलटून देखील आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. गावातील स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीय उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान रामचंद्र कुरुळे यांचा अवघ्या 10 वर्षाचा मुलगा संभव याचा देखील मृत्यू झाला. वैष्णवी आणि संभव या दोन्ही दिव्यांग भावंडांच्या मृत्युला प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तोपर्यंत संभववर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुरुळे कुटुंबियांनी घेतली होती.
प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांचा आत्मदहानाचा प्रयत्न
संभवच्या मृत्युला 18 तास उलटले तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता चिखर्डेतील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत. प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दिव्यांग बांधवांना जगण्याचा अधिकार नाही का असा सवाल संजीवनी बारंगुळे यांनी विचारला. तर जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
संबंधित बातम्या
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल






















