एक्स्प्लोर

Narayan Rane : नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा

Devendra Fadnavis On Narayan Rane : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या 74 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासावर आणि नेतृत्वावर भाष्य करत खास आठवणी शेअर केल्या.

सिंधुदुर्ग : नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस, त्यांच्या कामामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा वर्ग तयार झाला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कौतुक केलं. नारायण राणे यांच्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असल्याने त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा विचार सोडला नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा 74 वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Devendra Fadnavis Speech : राणेंकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नारायण राणेंसोबत काम करताना मिळालेल्या अनुभवांची आठवण सांगितली. मी सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं, तेव्हा राणेंनी पाठवलेली ‘छान बोललास’ ही चिठ्ठी आजही आठवते, असे ते म्हणाले. त्यांनी पुढं सांगितलं की, नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासोबत काम करणे ही मोठी संधी होती. दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.

Narayan Rane Assembly Impact : अर्थसंकल्पावर पकड आणि प्रभावी नेतृत्व

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंची अर्थसंकल्पावरची पकड विलक्षण होती. ते एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे बजेटवर बोलायचे. युती सरकारच्या काळात झालेल्या कामाची काँग्रेस सरकारने श्वेत पत्रिका काढल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर ‘भगवी पत्रिका’ मांडत सरकारची जोरदार बाजू मांडली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Narayan Rane Political Legacy : राणेंचा दरारा आणि वारसा

विधानसभेत राणेंचा मोठा दरारा होता. त्यांच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षात असतानाही आम्ही सरकारवर तुटून पडायचो, असं फडणवीस म्हणाले. राणेंचा दिलदार स्वभाव आणि राज्यभर तयार झालेला जनाधार यावरही त्यांनी भाष्य केले. “राणे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस आहे. कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड असतो, असं पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे, ते राणेंना पाहूनच लिहिलं असावे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Family Support : कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

फडणवीस यांनी राणेंच्या कुटुंबीयांचाही उल्लेख केला. नीलम राणे यांचा त्यांना नेहमीच भक्कम पाठिंबा आहे. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात त्यांचा राजकीय वारसा स्पष्टपणे दिसतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

राणेंनी कोकणाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, “ते देश आणि राज्याचे नेते असले तरी त्यांच्या हृदयात कोकण आहे. राणेंना अजून खूप नेतृत्व करायचे आहे. त्यांचा 100वा वाढदिवसही आपण अशाच मोठ्या मैदानावर साजरा करू.”

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत न पाहिलेला ट्विस्ट, 2 तासांआधी काय घडलं?
ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत न पाहिलेला ट्विस्ट, 2 तासांआधी काय घडलं?
Konkan Vidhan Parishad Election 2026: नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचा विधान परिषदेचा उमेदवारच फोडला!
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचा विधान परिषदेचा उमेदवारच फोडला!
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget