एक्स्प्लोर
शेतकरी संपाचं नेतृत्व करा, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं राज ठाकरेंना साकडं

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं साकडं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी घातलं आहे. त्यामुळे राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतील, अशी शक्यता आहे. ज्या पुणतांब्यात शेतकरी संपाच्या आंदोलनाला सुरुवात झाली, त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच पुणतांब्यातील शेतकरी बांधव मुरलीधर थोरात, बबनराव धनवटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे, गणेश जाधव यांची उपस्थित होती. राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढवला जाईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. दरम्यान बाळा नांदगांवकर यांनीही काही दिवसांपूर्वीच पुणतांब्यात जाऊन संपकरी शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तर राज ठाकरेंनीही शेतकरी संपावर आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्यात मनसे सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसत आहे.
Before You Go
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















