एक्स्प्लोर

Sharad Pawar: 'माझं नाव घ्यायचा काय संबंध, या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते', विलीनीकरणाच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar: विलीनीकरणाची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर, राष्ट्रवादी (शदरचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना फडणवीसांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं.

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून चर्चा सुरू आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील संभाव्य विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे नेते बैठका झाल्याचे, चर्चा फायनल झाल्याचे आणि घोषणा करण्याची तारीख ठरल्याचे सांगत होते, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या वादात उडी घेत आपली प्रतिक्रिया दिली, यामुळे राजकारण अधिकच तापले आहे. विलीनीकरणाची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर, राष्ट्रवादी (शदरचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज माध्यमांशी बोलताना फडणवीसांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं. (Devendra Fadnavis) 

या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते

विलीनीकरणाच्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं, त्याची कल्पना मला दिली असती, जर विलीनीकरणाचा मुद्दा होता तर ते एनडीएसोबत आले असते का? यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, फडणवीस यांनी माझं नाव घ्यायचा काय संबंध आहे , या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा काही अधिकार आहे, असं मला वाटतं नाही, असंही पुढे ते म्हणालेत. अजित दादा आणि जयंत पाटील विलीनीकरणाच्या बाबत चर्चा करत होते, असंही ते म्हणालेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या प्रश्नावर पवारांनी बोलणं टाळलं आहे, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून मी त्यांना खुशीने आशीर्वाद देईल असंही ते पुढे म्हणालेत.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेले?

अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते; पण माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. अजित पवार जर समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असतील, एकत्रीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का? किंबहुना एकत्रीकरणाची चर्चा भाजपसोबत करणार नाहीत का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यादरम्यान विलिनीकरणाबाबत नेमके काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. अशा प्रकारची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती मला नाही. सध्याच्या दुःखद प्रसंगी याबाबतचे राजकारण करणे मला योग्य वाटत नाही, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो; पण ते मी करणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दादा माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांचे निर्णय हे सर्वस्वी तेच घेत असतात. त्याच्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो; पण अजितदादांचा पक्ष सरकारमध्ये आहे. असा कोणताही निर्णय ते घेणार असते, तर त्यांनी आमच्याशी चर्चा निश्चित केली असती. ते जर चर्चा करत होते म्हणजे सरकारमधून ते बाहेर पडणार होते का? सरकार तर स्थिर आहे. त्यांचे आणि शरद पवारांचे काय बोलणे झाले मला माहिती नाही; पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहिती नाही. तसेच अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच आम्ही एक तास गप्पा मारल्या होत्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अचानक गाडीने घेतला पेट, नवले पुलावर पुन्हा वाहतूक कोंडी, अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल 
अचानक गाडीने घेतला पेट, नवले पुलावर पुन्हा वाहतूक कोंडी, अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल 
Nasrapur Girl Death : नसरापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, सहा अधिकाऱ्यांची टीम स्थापन
नसरापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, सहा अधिकाऱ्यांची टीम स्थापन
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Pune News: पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget