Pune SPPU News : Pune SPPU News 'माझं बाहेर पडणं मुश्किल झालंय'; NSUIच्या अध्यक्षावर मुलीचा खळबळजनक आरोप, पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या संघटनेच्या अध्यक्षाने विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीची विद्यार्थी (Pune SPPU) संघटना म्हणजेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या संघटनेच्या अध्यक्षाने विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षय कांबळे असं या अध्याक्षाचं नाव असून त्याच्याविरोधात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठ एन्.एस्.यु.आय. अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीला छळ केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातील पिडीत मुलीने या संदर्भात कोणालाही माहिती दिली नव्हती. मात्र मेसेज आणि त्रास वाढत असल्याचं पाहून आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अक्षय कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.
अक्षय मला दोन महिन्यापासून नाहक त्रास देत आहे. मला टॉर्चरिंग करत आहे. त्याने माझं विद्यापीठातील जगणं मुश्किल केलं आहे. त्यामुळे मी वसतीगृहाच्या बाहेर पडत नाही. त्याने माझं वसतीगृहाच्या बाहेर पडणदेखील मुश्किल केलं आहे. बाहेर पडल्यावर मला त्याची भीती जावणत असते. आज त्याने आपल्या संघटनेचे गुंड आणून मला धमकावण्याचा प्रकार केला. त्यामुळे मला अजून भीती वाटत आहे. विद्यापीठ आणि पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी. त्याने माझं जगणं मुश्किल केलं आहे. मना प्रचंड मानसिक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे विद्यापीठानेदखील अक्षय कांबळेंवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी पिडीत मुलीने केली आहे.
पुण्यातील विद्यापीठात असे अनेक प्रकार चालतात. त्यातील काही प्रकार मुली बोलल्या तर बाहेर पडतात तर काही प्रकरणं मुली समोर न आल्याने दाबले जातात. मात्र असे प्रकार घडत असतील तर मुलींनी समोर येऊन बोललं पाहिजे आणि अशा वृत्तीला धडा शिकवला पाहिजे शिवाय विद्यापीठ प्रशासनानेदेखील या गोष्टींवर लक्ष देणं गरजेच आहे.
इतर महत्वाची बातमी-
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















