एक्स्प्लोर
पुणेकरांना हायकोर्टाचा दिलासा, रामवाडी ते वनाज दरम्यान मेट्रोच्या कामाला हिरवा कंदील
राम वाडी ते वनाज या मेट्रोचे काम थांबवा असे आदेश हायकोर्टाने दिले होते. परंतु ही स्थगिती आता हायकोर्टाने उठवली आहे.

मुंबई/पुणे : पुणे मेट्रोचा मार्ग परस्पर बदलणाऱ्या एमएमआरसीएलला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. या प्रकल्पाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील याचिकाही फेटाळून लावली आहे. राम वाडी ते वनाज व्हाया आगा खान पॅलेस असा मेट्रोचा मार्ग सुरूवातीला एमएमआरसीएलने निश्चित केला होता. परंतु मेट्रोच्या मार्गात अचानक बदल करत आगा खान पॅलेस ऐवजी हा मार्ग आता कल्याणी नगर येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य येथून वळविण्यात आला आहे. त्यामुळे हे अभयारण्य या मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणार असून येथील सुमारे 300 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याशिवाय या मार्गाचा खर्चही 185 कोटी रुपयांनी वाढणार आहे. मात्र येथील पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी कल्याणी नगर येथील रहिवासी दीपक नाथानी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या सुनावणीवेळी मार्ग बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून जोपर्यंत अधिसूचना जारी केली जात नाही तोपर्यंत रामवाडी ते वनाज मार्गावरील मेट्रोचे काम थांबवा, असे आदेश दिले होते. मात्र पुणे मेट्रोचे रखडलेले काम पाहता हायकोर्टाने ही स्थगिती उठवत याचिकाकर्त्याना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग






















