एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका; म्हणाले, निर्णय घेण्याची क्षमता राजकीय नेत्यांमध्ये नाही

Prakash Ambedkar: झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही, असंही त्यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे.

पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर, भारत सरकारने कारवाई करत सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द केले, इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसाठी अटारी बॉर्डरचे दरवाजे देखील बंद केले आहे. पाकच्या नागरिकांना देखील त्यांच्या देशात परत जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, सरकारने तेथील पर्यटकांना बाहेर काढलं. ही चूक केली. खरं तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता, पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही हा प्रश्न होता. पाहिजे तर सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता. हल्ला होवूनही पर्यटक आहेत आणि स्थानिक मदत करत आहेत. तर पर्यटकांना बाहेर काढलं नसतं त्यांना सुरक्षा दिली असती तर कळलं असतं परिस्थिती कळाली असती की, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं म्हटलं आहे. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही. वर्ड बँकेची गॅरंटी आहे, त्याचं परिणाम काय होणार आहे, हे केंद्र सरकारने सांगावं. सामान्य माणूस हे विचारात आहेत. इतकी हत्यार विकत घेतली आहेत, विमान घेतली त्याच उपयोग काय? केंद्र सरकारला तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्राई घोडे नाचवणं थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगची आहे, राजकीय कमतरता आहे. निर्णय घ्यायला शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक शासनाच्या पाठीशी उभे राहतील असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले आम्ही 2 मे ला हुतात्मा स्मारकाला बसणार आहोत. यावेळी जे पाठिंबा देत आहेत त्यांनी तिथे कागदावर सही करावी. कारवाईला पाठिंबा असेल तर सही करावी ही मोहीम आम्ही घेणार आहोत. राजकीय पक्षांचे कार्यकते यायला हरकत नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आलं तर चालेल. आम्ही पक्षाचा ध्वज वापरणार नाही आम्ही राष्ट्रध्वज घेऊन बसणार आहोत. इतर पक्षांनी सहभागी व्हावं, तो पुर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे. पण येताना त्यांनी पक्षांचा झेंडा आणू नये. 2 मे च्या आंदोलनात उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावा. आम्ही नेत्यांना बोलणार नाहीत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घ्यावा, असंही पुढे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.  

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन प्रिंसिपलवर निर्णय घेणं महत्वाचं आहे. तुमच विल आहे का आणि गरज या दोन गोष्टीचा संगम होणार असेल तर निर्णय घेतला पाहिजे. ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा. तुमच नाक कापल गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का? कुठले इनपुट नव्हते, सर्व इनपुट होते, निर्णय घेण्याची क्षमता राजकीय नेत्यांमध्ये नाही 
, त्यामुळे आम्ही हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

धर्म विचारून गोळी मारली यासंबंधिच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म विचारून गोळी मारली याला काहीजण होय म्हणतात. काही नाही म्हणतात. जे गेले आहेत ते सर्व भारतीय आहेत. त्यामध्ये ख्रिशन, मुस्लिम पण मारले गेलेत. मात्र इथे मध्यम आणि राजकीय नेते नरेटीव सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बसू शकत नाहीत म्हणजे ते किती सीरियस आहेत हे लक्षात येत. पंतप्रधानांनी ब्रिफिंग करणे गरजेचं होतं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Rainfall Landslide : उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 600 मिमी पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणे म्हणाले...
600 मिमी पाऊस झाल्यानं दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणेंनी सांगितले पूर्वसंकेत...
Pune Rain News: मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; तर पुण्यात दोन दिवसांत तब्बल 30 झाडपडीच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
Ketan Agrawal Death Case :
"45 वर्षांची ओळख होती म्हणून जास्त चौकशी केली नाही"; केतनच्या आजोबांनी सांगितली लग्न जमवण्याआधी केलेली 'ती' मोठी चूक
Pune News: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget