एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका; म्हणाले, निर्णय घेण्याची क्षमता राजकीय नेत्यांमध्ये नाही

Prakash Ambedkar: झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही, असंही त्यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे.

पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर, भारत सरकारने कारवाई करत सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द केले, इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसाठी अटारी बॉर्डरचे दरवाजे देखील बंद केले आहे. पाकच्या नागरिकांना देखील त्यांच्या देशात परत जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, सरकारने तेथील पर्यटकांना बाहेर काढलं. ही चूक केली. खरं तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता, पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही हा प्रश्न होता. पाहिजे तर सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता. हल्ला होवूनही पर्यटक आहेत आणि स्थानिक मदत करत आहेत. तर पर्यटकांना बाहेर काढलं नसतं त्यांना सुरक्षा दिली असती तर कळलं असतं परिस्थिती कळाली असती की, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं म्हटलं आहे. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, झेलम , चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा पाणी सांगितला जात आहे. नद्याचं पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत किंवा पाणी कसे अडवणार हे सांगितलं नाही. वर्ड बँकेची गॅरंटी आहे, त्याचं परिणाम काय होणार आहे, हे केंद्र सरकारने सांगावं. सामान्य माणूस हे विचारात आहेत. इतकी हत्यार विकत घेतली आहेत, विमान घेतली त्याच उपयोग काय? केंद्र सरकारला तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्राई घोडे नाचवणं थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगची आहे, राजकीय कमतरता आहे. निर्णय घ्यायला शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक शासनाच्या पाठीशी उभे राहतील असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले आम्ही 2 मे ला हुतात्मा स्मारकाला बसणार आहोत. यावेळी जे पाठिंबा देत आहेत त्यांनी तिथे कागदावर सही करावी. कारवाईला पाठिंबा असेल तर सही करावी ही मोहीम आम्ही घेणार आहोत. राजकीय पक्षांचे कार्यकते यायला हरकत नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आलं तर चालेल. आम्ही पक्षाचा ध्वज वापरणार नाही आम्ही राष्ट्रध्वज घेऊन बसणार आहोत. इतर पक्षांनी सहभागी व्हावं, तो पुर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे. पण येताना त्यांनी पक्षांचा झेंडा आणू नये. 2 मे च्या आंदोलनात उपस्थित राहून पाठिंबा दर्शवावा. आम्ही नेत्यांना बोलणार नाहीत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घ्यावा, असंही पुढे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.  

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन प्रिंसिपलवर निर्णय घेणं महत्वाचं आहे. तुमच विल आहे का आणि गरज या दोन गोष्टीचा संगम होणार असेल तर निर्णय घेतला पाहिजे. ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा. तुमच नाक कापल गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का? कुठले इनपुट नव्हते, सर्व इनपुट होते, निर्णय घेण्याची क्षमता राजकीय नेत्यांमध्ये नाही 
, त्यामुळे आम्ही हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

धर्म विचारून गोळी मारली यासंबंधिच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म विचारून गोळी मारली याला काहीजण होय म्हणतात. काही नाही म्हणतात. जे गेले आहेत ते सर्व भारतीय आहेत. त्यामध्ये ख्रिशन, मुस्लिम पण मारले गेलेत. मात्र इथे मध्यम आणि राजकीय नेते नरेटीव सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बसू शकत नाहीत म्हणजे ते किती सीरियस आहेत हे लक्षात येत. पंतप्रधानांनी ब्रिफिंग करणे गरजेचं होतं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Accident News: डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Embed widget