एक्स्प्लोर

आठ राज्यांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध : शरद पवार

समाजात तातडीच्या आणि गंभीर प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळवलं गेलं पाहिजे यासाठी हे सुरु आहे. दुफळी दिसली पाहिजे असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे

पुणे : "देशात सध्या जे गंभीर प्रश्न आहेत, त्यापासून लक्ष दूर करण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणला आहे. परंतु आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे,"अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. तसंच "सीएए आणि एनआरसीबद्दलचं आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच करण्यात यावं. आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना त्याबद्दल कळवतो आहोत. कायदा हातात घेणे योग्य नाही," असंही पवार म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदे शरद पवार यांनी सीएए, एनआरसीसह विविध मुद्द्यावर केंद्र सरकार आणि राज्यातील मागील भाजप सरकारवर टीका केली. शरद पवार म्हणाले की, "देशात सगळीकडे सीएए आणि एनआरसीबाबत वेगळं चित्र आहे. लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हे विधेयक जेव्हा संसदेत आलं तेव्हा आम्ही विरोध केला. विधेयकाविरोधात मतदान केलं. मात्र देशात सध्या जे गंभीर प्रश्न आहेत त्यापासून लक्ष दूर करण्यासाठी हे सगळं सुरु आहे." आठ राज्यांचा सीएएच्या अंमलबजावणीला विरोध "समाजात तातडीच्या आणि गंभीर प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळवलं गेलं पाहिजे यासाठी हे सुरु आहे. दुफळी दिसली पाहिजे असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. आठ राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे. एनडीएमधील नितीश कुमार, नवीन पटनायक यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला आहे. केवळ अल्पसंख्याकच नाही तर समाजातील वेगवेगळे घटक, कलाकार सीएएला विरोध करत आहेत. शिवाय समाजासाठी ज्यांनी योगदान दिलंय ते देखील विरोध करत आहेत," असं शरद पवार यांनी सांगितलं. सरकारने फक्त तीन देशांचाच विचार केला, इतरांचा का नाही? गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरी हा शब्द वापरुन तीन देशांचा उल्लेख केला. त्यावरुन एक विशिष्ट धर्मावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. पण त्याचा परिणाम समाजातील सर्व गरीब घटकांवर होणार आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. ते म्हणाले की, "आसाममधील आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की इथे सर्वांनाच त्रास होत आहे. श्रीलंकेतून भारतात येणाऱ्या लोकांबद्दल का निर्णय घेतला नाही? नेपाळमधून किती लोकं भारतात येतात? माझ्याकडे नेपाळी लोक अनेक वर्षांपासून काम करत आहेत. बाहेरुन येणाऱ्या लोकांचं नाव घेत फक्त तीन देशांवरच लक्ष का केंद्रीत केलं?" कॅगचा अहवाल गंभीर, तज्ज्ञांमार्फत चौकशी व्हावी कॅगच्या अहवालाविषयी शरद पवार म्हणाले की, राज्याची आर्थिक शिस्त उद्ध्वस्त करण्यात आली आहे. कॅगने सादर केलेला अहवाल गंभीर आहे. अहवालानुसार 66 हजार कोटींचा हिशोब लागत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे माझी मागणी आहे की या देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रकरणाची तज्ज्ञांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी. जाणकारांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी.

महत्त्वाच्या बातम्या

Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget