एक्स्प्लोर

Pune Ajit Pawar News: भाजपनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले, इथं धडका मारुन काय होणार आहे का?; अजित पवारांचा भाजपला टोला

सध्या सगळे भाजपचे नेते बारामती दौरा करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले, या बारामतीत धडका मारुन काय होणार आहे का?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना विचारला आहे.

Pune Ajit Pawar News:  सध्या सगळे भाजपचे (BJP) नेते बारामती (Baramati) दौरा करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले, या बारामतीत धडका मारुन काय होणार आहे का?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना विचारला आहे. गेल्यावेळेस माझ्या विरोधात निवडणूक लढवली त्याच्यासहित सगळ्यांच डिपॉझिट जप्त, अशा शब्दात त्यांनी टोलाही लगावला आहे. निर्मला सीतारमण या बारामतीचा दौरा करणार असल्याचं बोललं जातंय मात्र त्या कधी येणार माहिता नाही मात्र आल्या तर त्यांचं बारामतीत स्वागत करु, त्यांनी कधीही यावं, असंदेखील ते म्हणाले. 
 
मी माझ्या कामाची सुरुवात पहाटे लवकर उठून करतो. त्यामुळे सलग सातव्यांदा मला बारामतीची लोकं निवडून देत आहेत. लोकांनी मला निवडून दिलं आहे म्हणून मी काम करत असतो. त्यामुळे बारामतीकर मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देतात. काही दिवस झाले अनेक नेते बारामतीला भेट देत आहे. महाराष्ट्रात कूठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, असंदेखील ते म्हणाले.

जगात सगळ्यात मोठा असणारा देश भारत आहे. लोकसंख्या देखील आपली जास्त आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर दोनच मुलं असतील तर त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येतं तसंच त्यांचं भविष्यदेखील उज्वल करु शकतो. शिक्षणासाठी आम्हाला जे चांगलं करता आलं ते आम्ही कायम करण्याचा प्रयत्न करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महिलांना आरक्षण दिलं, सरपंच पदासाठी संधी दिली तर यांनी नवीन टुम काढली मी म्हटलं सरपंच थेट तर मुख्यमंत्री जनतेतून करा, त्यावेळी सगळ्यांची ताकद बघू मात्र हे सगळं सोयीनुसार होत आहे. दादा बॉडी एकाची आणि सरपंच एकाचा,असं लोक आम्हाला सांगतात. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी निर्माण होतात, असंही ते म्हणाले.

सरकार स्थापन होऊन देखील आतापर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे सगळेच निर्णय अधिकारी घेऊ शकत नाही. त्यामुळे जनतेची कामं खोळंबली आहेत. अधिकाऱ्यांनादेखील कळत नाही सरकार किती दिवस चालेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच राज्यासाठीचे सगळे निर्णय घेत आहेत. सध्या मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत परंतु पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांना लवकरात लवकर पालमंत्र्यांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget