मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Lok Sabha Elections) महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) महायुतीचा (Mahayuti) धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून (Sangli Lok Sabha)  दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी (Vishal Patil)  पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विशाल पाटील यांनी  मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट  घेतली. आमदार विश्वजीत कदम देखील या वेळी उपस्थित होते. राहुल गांधी देखील विशाल पाटील आणि विश्वजीत कदमच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. 


अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले. दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत  विशाल पाटील यांनी दिले. काँग्रेसला समर्थनचे पत्र  दिले. विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत. विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचे भेटून अभर मानले. आम्ही उमेदवारीसाठी अटीतटीची प्रयत्न केले. मी कुठलीच शर्थ न ठेवता मी पाठींबा जाहीर केला. मी काँग्रेस सोबत राहणार आहे. 






सांगलीच्या महाविकास आघाडीचे उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत संपला नाही आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. पण, या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण तू तू मैं मैं करता-करता अखेर सांगलीची जागा ठाकरेंच्याच पदरात पडली. त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. 


सोनिया गांधीची घेतली भेट 


सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस चे नेते विश्वजीत कदम हे सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली.  दिल्लीतील त्यांच्या 10 जनपथ या बंगल्यावर भेट घेतली. अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिल आहे.


हे ही वाचा : 


Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?