एक्स्प्लोर

''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''

मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करुन त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले होते

रत्नागिरी : राज्यातील मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी न्यायालयाचा आदर ठेवत आपण उपोषण मागे घेत असल्याचं म्हटलं. दुसरीकडे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं असून सगेसोयरे संदर्भाने सध्या काम सुरू आहे, असं शासनाकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या हाताला काय लागलं, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसांत होणार असून ओसीबीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अद्यापही कायम आहे. त्यातच, आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरुन त्यांनी सवाल उपस्थित केलाय.  

मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करुन त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले होते. मात्र, त्यानंतरही मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य न झाल्याने एकनाथ शिंदेंनी सगेसोयरे संदर्भात दिलेल्या शब्दाचे काय झाले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटील यांचा बळी घेतलाय, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ घेऊन, खोटे जीआर काढणाऱ्या चाणक्याने एकनाथ शिंदे यांना पुढे करून सध्या सरळ जरांगे पाटील यांचा विश्वासघात केलाय. एकनाथ शिंदे यांना पुढे करणारा चाणक्यच लक्ष्मण हाकेंच्या मागे आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. तसेच, विश्वासघात करणाऱ्याला महाराष्ट्र माफ करत नाही, जनता विश्वासघात करणाऱ्यांना माफ करत नाही.राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः हैदोस मांडलाय. राज्यातील जनता हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघत आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता यांना घरी पाठवणारच, असेही जाधव  णङआऱआराज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः हैदोस मांडलाय. राज्यातील जनता हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघत आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता यांना घरी पाठवणारच, असेही जाधव यांनी म्हटले.  

भाजपा शिंदे-पवारांना खड्ड्यात टाकणार

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप हळू हळू खड्ड्यात टाकणार आहे. राज्यातील विधानसभा 2024 ची निवडणूक अमित शहा यांना भाजपच्या नेतृत्वात लढायची होती. मात्र, सध्या स्वबळावर भाजप येणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप निवडून लढतंय, असे म्हणत अमित शहा यांनी 2029 ला भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, या वक्तव्यावरुन शिवसेना व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.  

राज्यातील सर्व बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर करणार का?

अक्षय शिंदे प्रमाणे राज्यातील सर्व बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर करणार का?, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे आम्हाला दुःख नाही. पण, कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. 

हेही वाचा

मनोज जरांगे आंदोलनाची वात पुन्हा पेटवणार, डिस्चार्ज मिळताच बैठकांचा धडाका; मराठवाडा पिंजून काढणार

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget