Maharashtra Sindhudurga Politics: सिंधुदुर्ग : शिवसंकल्प अभियानाची नियोजन बैठक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत पार पडली. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar), आमदार उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 8 जानेवारीला कोकणात शिवसंकल्प अभियान सभा घेण्यासाठी येणार आहेत. याचवेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून चाचपणी केली जात आहे. 


दीपक केसरकर यांनी नियोजन बैठकीत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आमचे उमेदवार असतील, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. भाजपकडून (BJP) रवींद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश पक्षानं दिल्याची चर्चा सध्या सर्व जिल्ह्यात आहे. असताना आज मात्र या मतदारसंघावर शिंदे गट दावा करताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीत लोकसेभेच्या जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. 


दिपक केसरकर बोलताना म्हणाले की, "रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे शिंदे गटाचा यावर दावा आहे. मात्र आजपर्यंत जे फिरत नव्हतं, ते आज निवडणुकीच्या प्रत्येकाच्या दारोदारी जायला लागले, अस नाव न घेता टोला विनायक राऊत यांना लगावला आहे. बाळासाहेबांचं स्वप्न असलेलं राम मंदिर आणि 370 कलम मोदींनी हटवलं आहे." 


"नारायण राणेंशी माझा कधीही वाद नव्हता, आजही आम्ही एकत्र प्रेमानं काम करतो. खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांसोबत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकत्रित मेळावे घ्यायचे. माझ्यावर शिवसेनेत असताना अन्याय झाला, तरी मी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली. भाजप शिवसेना युती संजय राऊत यांच्यामुळे तुटली याचा राग आमच्यावर न काढता संजय राऊत यांच्यावर काढला पाहिजे असता.", असं दिपक केसरकर म्हणाले.  


मी मंत्रिपदासाठी लाचार कधीच नव्हतो : दिपक केसरकर


"मोदींना भेटायला उद्धव ठाकरे यांना घेऊन गेल्यावर त्यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र मंत्रिपदासाठी मी लाचार नव्हतो, मी स्वाभिमानानं सांगितलं मला तुमच्या मंत्रिमंडळात स्थान नको म्हणून. काँग्रेसबरोबर जाणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, हे उद्धव ठाकरे यांनी कबूल केलं होत. दुसऱ्याचं ऐकून जर तुम्ही मला मंत्रिमंडळात घेणार नसला तर मी मंत्रिपदासाठी लाचार कधीच नव्हतो.", असं दिपक केसरकर म्हणाले.  


राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना दुखवून मी शिवसेनेत आलो, म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आघाडीच्या सरकारमध्ये मला मत्रिपद नाकारलं असा आरोप नाव न घेता शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर दीपक केसरकर यांनी केला आहे. ज्यावेळी बंडखोरी होत होती, त्यावेळी त्यांना एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला तुम्ही त्यांच्या सोबत जा, असं सांगतात. हे तुम्ही स्वतः सांगता आणि जाणाऱ्यांना गद्दार म्हणता हे कितपत योग्य आहे. खोके कोण घेतं? हे जगाला माहिती आहे. 


"बाळासाहेबाचा मुलगा आहे म्हणून सहनभुती मिळवत आहेत, मात्र बाळासाहेबांची इतर मुलं एकनाथ शिंदे यांच्यासोबत का आहेत? खोटी सहानभुती उद्धव ठाकरे मिळवत आहेत. आदित्य ठाकरे टेंडर काढायचं नाही आणि हा प्रकल्प गुजरात ने पळवला हे सागत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सारखे पर्यटन मंत्री कोकणाच्या काय कामाचे. बाळासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी मी शिवसेनेत आलेलो होतो. आदित्य ठाकरे यांनी अडीच वर्षात पर्यटनासाठी काय केलं नाही. लोकहिताच्या चादा ते बांदा यासारख्या योजना बंद केल्या 450 कोटी परत गेले अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या वर यावेळी केली.", असं दिपक केसरकर म्हणाले. दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यात सिंधुदुर्गात मतभेद असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांना सभोदताना वक्तव्य केलं.