एक्स्प्लोर

अजित पवारांच्या दमदाटी भाषणावर शरद पवारांचा पहिल्यांदाच थेट हल्ला; बारामतीतून 'करेक्ट कार्यक्रम'ची आठवण

गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते,आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांचे बारामती दौरे वाढल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थिती दर्शवत बारामतीच्या विकासासाठी वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायला मागेपुढे पाहणार असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात पोहोचले असून तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं. तसेच, लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, येथील भाषणातून शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं. अजित पवारांनी (Ajit Pawar) निवडणूक काळात केलेल्या दमदाटीच्या भाषणावर थेट हल्लाबोल केला.  

गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते,आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला. मात्र, यावेळी एक वेगळी स्थिती निर्माण झाली असून आज इकडे 10-15 लोक असे दिसत आहेत की, जे 56 वर्षांपूर्वी साथ देणारे आजही इथच आहेत. इथं अनेकजण माझ्यासोबत काम करत होते. या भागात येताना काळजी घ्यावी लागत असे, पण मी गेले 56 वर्ष निवडणूक लढलो आणि जिंकलो. पहिली निवडणूक सोपी नव्हती,कष्ट घ्यावे लागले, हा भागात नंतर तुम्ही सांभाळला, मी राज्यात फिरत होतो. नंतर तीन वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिले, तर देशाच्या लोकशाहीत मलाही निवडून दिले.

यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती,देशात आणि जगभर देशभर गेली. अनेकांना चिंता होती काय होईल कसं होईल, सत्ता हातात नाही, राज्याची सत्ता नाही. त्यातच, काही लोकांना फोन येऊ लागले, प्रेमाने, दमदाटीही केली, जे माहिती नव्हतं ते या निवडणुकीत पहिला मिळालं. मात्र, या निवडणुकीत लोक पुढे येतच नव्हते, न बोलणारी ही निवडणूक होती. मात्र, ज्या गावात लोक पुढे येत नव्हते, तिकडे मतदान झालं. लोक बोलत नव्हते पण त्यांना सागवा लागलं नाही आणि लोकांनी तुतारी दिल्लीला पाठवली, असे म्हणत बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केल्याचं शरद पवार यांनी सूचवलं. 

दमदाटी करणाऱ्यांची नोंद मतदारांनी घेतली नाही

आता, साहजिकच लोकांच्या कामासाठी आम्हाला अधिक लक्ष घालावं लागेल. आज मोदींची सत्ता आहे, आपली सत्ता नाही, एक वेगळा विचार दाखवायला सुरुवात केली. मोदी समोर कोणी टिकणार नाही, असं बोलले. मोदींनी राज्यभर 16 सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं हे माझे भाग्य समजतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा लढलो आणि 31 जिंकलो, राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकून दिले. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, इतर कोणीही असो, दमदाटी करणाऱ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही, त्यांनी आपलं मतदान योग्य ठिकाणी केले, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. 

सत्ता हाती घ्यावी लागेल

आज अनेक प्रश्न आहेत,ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ते सोडवले नाहीत, त्यांची जबाबदारी होती पण आता आम्हाला लक्ष घालावं लागले (हे नीट ऐकावे). बाळांनो इतके वर्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे विचारले पाहिजे. तुमचा आम्हाला निकाल घ्यावा लागेल. सत्तेचा गैर वापर करणाऱ्याना त्यांची जागा दाखवावी लागेल. आपल्याला सत्ता बदलावी लागेल, सत्ता हातात घेतली पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हटले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फुटलेले खासदार भाजपात न जाता मिंधेकडेच का गेले? हे ऑपरेशन टायगर नाही तर 'ऑपरेशन देवेंद्र', हिंगोलीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फुटलेले खासदार भाजपात न जाता मिंधेकडेच का गेले? हे ऑपरेशन टायगर नाही तर 'ऑपरेशन देवेंद्र', हिंगोलीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शिंदेंच्या आमदाराने व्यावसायिकाकडे 40 लाख मागितले, कथित स्टिंग ऑपरेशन समोर, ठाकरे सेनेचा सर्वात मोठा ट्रॅप
शिंदेंच्या आमदाराने व्यावसायिकाकडे 40 लाख मागितले, कथित स्टिंग ऑपरेशन समोर, ठाकरे सेनेचा सर्वात मोठा ट्रॅप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
Embed widget