परभणी : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना' अशी झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) घेऊन गेले मात्र टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना अशी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कसलेला पैलवान भाजपवाल्यांना कधीही लुडबूड करू दिली नाही. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांची भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Parbhani Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुला दिवाना


परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय जाधव यांनी बंडखोरांवर टीका करताना म्हटलं की, आमचा पक्ष घेऊन गेले, मात्र शिवसेना टिकवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्यासारखी आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कसलेले पैलवान होते. भाजपवाल्यांना त्यांनी कधीही लुडबूड करू आमच्यात करू दिली नाही, असं वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे. 


ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका - संजय जाधव


संजय जाधव पुढे म्हणाले की, आज परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेला धनुष्यबाण मिळून देणारा जिल्हा असताना मुख्यमंत्र्यांना इथे उमेदवार देता आला नाही, ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका आहे. वाशिम, रामटेक, हिंगोली अजून अनेक ठिकाणी यांची वाईट अवस्था झालीय. मात्रं आम्ही परभणीची जागा ही जिंकणारच तसेच राज्यभरामध्येही भाजपपेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वास परभणी लोकसभेचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.


महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार


संजय जाधव यांनी यावेळी म्हटलं की, परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मी आज महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार. तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेत आज परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी, मला समर्थन दर्शवण्यासाठी तुम्हा सर्वांची अलोट गर्दी पाहून भारावून गेलो.


आपला विजय निश्चित : संजय जाधव


सलग तिसऱ्यांदा अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित जनतेशी संवाद साधला. यावेळी संजय जाधव म्हणाले की, "एवढ्या मोठ्या संख्येनं असणारी तुमची उपस्थिती क्रांतीची मशाल घेऊन इथे अवतरली. आजवर तुमचं प्रतिनिधीत्व करताना कुठेही कसूर ठेवली नाही. वाघाचे छावे इथल्या रस्त्यांवरती चालते झाले आणि त्याच क्षणी विरोधकांना धडकी भरली. 2-2 उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे यावं लागलं, हीच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याची ताकद आहे. महाविकास आघाडीचे नेते सर्वशक्तीनिशी बाहेर पडले आहेत. आपला विजय निश्चित झाला."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : तिकीट कापलेले भाजप खासदार शिवबंधन बांधणार? उन्मेष पाटील आज ठाकरे गटात सामील होण्याची शक्यता