चंद्रपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर न्यायालयाने त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. राऊत यांनी खलनायकी स्वरुपाचे राजकारण केले. ते कधीही सामान्य, गरजूंच्या प्रश्नावर बोलले नाही. त्यामुळे त्यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे, अशी खोटक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.


Sanjay Raut Timeline : संजय राऊतांची 17 तास चौकशी, नंतर अटक! काल सकाळपासून मध्यरात्री अटकेपर्यंत नेमकं काय-काय घडलं?


शिव्या देण्याचे विक्रम त्यांच्या नावे आहे


मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी कधीही वंचितांचे आणि बेरोजगारांचे-शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यासाठी हेच कारणीभूत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते. त्यांनी कधीही वंचितांचे प्रश्न मांडले नाही. त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत अपशब्द वापरले. 70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.


Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी, जाणून घ्या दोन्ही बाजूंचे युक्तीवाद


राऊतांकडून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न


राऊतांनी राज्याला बदनाम करण्यासाठी शेतकरी आंदोलनातील टीकैत यांचीही गळाभेट घेतली होती. सत्तेत असताना आपण अमर पट्टा घेऊन आलो आहोत, असा भाव राऊत यांचा होता. कधी पत्रा चाळवासीयांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. ती देखील यांनी अडवली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. वकिलांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असेही मुनगंटीवार म्हणाले.


Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांच्या अटकेचे संसदेत पडसाद उमटणार? राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस