एक्स्प्लोर

Ramdas Athawale: झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे; नितेश राणेंना रामदास आठवलेंचा प्रेमळ सल्ला

नितेश राणेंनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नये असा सल्ला आठवलेंनी आपल्या खास शैलीत नितेश राणेंना दिलाय.

Ramdas Athawale on Nitesh Rane: मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे.झटक्याने करा अगर पटक्याने करा.पण नितेश राणे यांनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नका असा प्रेमळ सल्ला केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी नितेश राणेंना दिलाय.नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटन विका असा मुद्दा मांडला आहे यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्याचा शैलीत उत्तर दिलं आहे.

राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी फक्त हिंदू धर्मीय झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम नावाचं पोर्टल सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात यावरून राजकारण तापलं आहे. एका संविधानिक पदावरील व्यक्तीने एकाच धर्माच्या लोकांकडून मटण खरेदी करण्याचं आवाहन करणं योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित झालेल असताना अल्पसंख्यांकमंत्री रामदास आठवले यांनी नितेश राणेंना मटण झटका असो की हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. नितेश राणेंनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नये असा सल्ला दिलाय.

काय म्हणाले रामदास आठवले?

नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटन विका असा मुद्दा मांडला आहे यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्याचा शैलीत उत्तर दिलं आहे.मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे.झटक्याने करा अगर पटक्या ने करा.पण नितेश राणे यांनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नका असा सल्ला देखील आठवले यांनी दिला आहे.मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत.त्यामुळे सर्व धर्म समभाव संविधान निर्माण झालं आहे त्याचा विचार करता मी नितेश राणे यांचा भूमिकेशी सहमत नसल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते या नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले यांनी नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत त्यावेळी नितेश राणे ही नव्हते आणि मीही नव्हतो. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख हे मुस्लिम होते असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुसलमान हे मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत आणि हाच इतिहास असल्याचे आठवले यांनी सांगितल आहे. 

शिवाजी महाराजांवरील टीका चूकीची आणि मूर्खपणाची: रामदास आठवले

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना लोकांनी जास्त वाचू नये. जास्त वाचले की डोक्यावर परिणाम होतो त्यामुळे वाद निर्माण होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील टीका ही चुकीची आणि मूर्खपणाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा काँग्रेस पक्षाने लपवून ठेवला आणि काँग्रेसकडून शिवरायांची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याची टीका मंत्री शिवेंद्रसिहराजे यांनी केली होती हे म्हणणे योग्यच असल्याचं आठवलेंनी सांगितलं.त्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. छावा चित्रपटातून हा इतिहास आता पुढे येतो आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Embed widget