Prithviraj Chavan on Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) हाती आले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी निवडून आले आहेत. शिवाय, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. या मतांची फायदा महायुतीला झालाय. तर मविआचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, काँग्रेसची मतं फुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)  चांगलेच संतापले आहेत. मुंबईत एबीपी माझाशी बोलताना फुटलेल्या मतांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


पृथ्वीराज चव्हाण काय काय म्हणाले? 


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही जी रणनीती ठरवली होती त्यानुसार आमचे तीन उमेदवार निवडून यायला हवे होते, पण आम्ही आकडेवारी पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की काँग्रेसची मतं ही निश्चित फुटली आहेत.  ज्यांनी मत महाविकास आघाडीला दिली नाही, अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हाय कमांडला पाठवली आहेत. या आमदारांवर लवकरच हाय कमांडकडून कारवाई केली जाईल. अपक्षांचा उपयोग महाविकास आघाडीला झाला नाही यासंदर्भात मी कोणती कमेंट करणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं. 


कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार विजयी? 


भाजपचे विजयी उमदेवार


1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार


1) भावना गवळी - 
2) कृपाल तुमाने


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)


1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर


काँग्रेस विजयी उमेदवार


1) प्रज्ञा सातव - 26


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे


1.) मिलिंद नार्वेकर  


काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही, शरद पवार गटाप्रमाणेच निर्धास्त 


विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 4 राजकीय पक्षांना  आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी काळजी घेतली होती. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते. पक्षात एकजूट दाखवली नाही, त्यामुळेच काँग्रेसची अनेक मतं फुटली आहेत, असं राजकीय विश्लेषकांचे मतं आहे. 


इतर महत्चाच्या बातम्या 


Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीला 9 जागा, मविआच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापचे जयंत पाटील पराभूत