एक्स्प्लोर

Nanar Refinery: फडणवीस सत्तेत आल्याने नाणार येथील रिफायनरीला चालना मिळणार?

Nanar Refinery: कोकणातील रिफायनरीचं भवितव्य अद्याप देखील अधांतरी आहे. शिवसेना - भाजप युती झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारमधील रिफायनरी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Nanar Refinery: कोकणातील रिफायनरीचं भवितव्य अद्याप देखील अधांतरी आहे. शिवसेना - भाजप युती झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारमधील रिफायनरी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगावला पसंती दर्शवली. त्यानंतर मात्र मोठं आंदोलन देखील झालं. पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा केला. त्यावेळी बारसू - सोलगावमधील रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेतली होती. 

दरम्यान, लोकांचं म्हणणं ते आमचं म्हणणं अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. पण आता शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे रद्द झालेल्या नाणारमध्ये रिफायनरी होणार का? असा देखील सवाल निर्माण झाला आहे. कारण केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर आले. त्यावेळी बारसू - सोलगावमधील रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. आपलं म्हणणं मांडलं. पण, त्यानंतर नाणारमधील जागेचा पुन्हा एकदा रिफायनरीसाठी विचार करावा, अशी मागणी देखील केली गेली. नाणार येथील समर्थकांनी यावेळी मिश्रा यांची भेट घेतली. परिणामी आता कोकणातील रिफानरीसाठी जागा कोणती निश्चित होणार? हा देखील प्रश्न आहे. कारण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नाणार येथील जागा निश्चित झाली होती. पण, आता रद्द झालेल्या नाणारच्या जागेला फडणवीस सत्तेत आल्यानं चालना मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सध्या रिफायनरीचं भवितव्य काय? 

'एबीपी माझा'ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सौदी अरेबियाची आरमको कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात बोलणी सुरू आहेत. प्रकल्पाला विलंब होत आहे. त्यामुळे कंपनी नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. पण, आता रिफायनरी उभी राहिल्यास ती 20 मिलियन मेट्रीक टन प्रति वर्षी इतक्या क्षमतेचा असणार आहे. सध्या बारसू - सोलगावमधील रिफायनरीला विरोध असून त्याविरोधात स्थानिकांनी मोठं आंदोलन देखील उभारलं आहे. माती परिक्षण आणि ड्रोन सर्व्हे देखील स्थानिकांनी रोखला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यामध्ये मुंबई हायकोर्टानं त्यांना जामिन दिला आहे. बारसू - सोलगावमध्ये रिफायनरी झाल्यास आम्ही त्याला विरोध करू असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याचवेळी रिफायनरी व्हावी यासाठी देखील आता समर्थक पुढं येत आहेत. अर्थात सध्या सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या हाती कोकणातील रिफायनरीचं भवितव्य असणार आहे. अद्याप याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. पण, खातेवाटपानंतर यामध्ये वेगानं घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Embed widget