Nana Patole on Maratha Reservation :  "राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला, हे सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही. हे आज राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिले आहे. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीचा उद्देशच तो होता. मराठा ओबीसी संघर्ष संपवायचे सोल्युशन आमच्याकडे आहे, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो.  यासाठी पहिल्यांदा  जातनिहाय जनगणना करावी लागेल आणि यानंतर हे सर्व प्रश्न सुटू शकतील. मात्र  मोदी तयार नसल्याने हा वाद संपणारच नाही. या वादात सरकारच पेट्रोल टाकत असल्याची परिस्थिती आपण पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देतो", असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते पंढरपुरमध्ये बोलत होते.


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नाना पटोले आशावादी 


नाना पटोले म्हणाले, वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही, ही माझे गुरु विलासराव देशमुख यांची शिकवण आहे. मी डोक्यात ठेवलीये. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल. नाना पटोले यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आशावादी असल्याचे संकेत आज विठ्ठल मंदिरात दिले. नाना पटोले विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घातली. यावर खुश झालेल्या नानांनी थेट विना गळ्यात घेऊन देवाचे दर्शन घेतले. 


महाराष्ट्राला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत


फेटा आणि वीनाबाबत  विचारले असता नाना पटोले म्हणाले, हा फेटाही कार्यकर्त्यांनी घातला आणि वीणाही कार्यकर्त्यांनी घातल्याचे नाना पटोले म्हणाले. मला सध्या पेटत असलेला महाराष्ट्र शांत करायचा आहे. महाराष्ट्राला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत. माझी लढाई खुर्चीची नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची आणि जनतेच्या हिताची लढाई आहे.













इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar on Vishalgad Violence : संभाजीराजेंच्या आंदोलनावेळी संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला, सरकारने चौकशी करुन दंगलखोरांचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी