एक्स्प्लोर

Mumbai Pune Express Way: जे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालं, तेच अटल सेतूवरही घडू शकतं, मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुचवला उपाय

Mumbai Pune Express Way: अटल सेतूवर कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Mumbai Pune Express Way: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात आडोशी बोगद्यानजीक झालेल्या गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा सेतू (अटल सेतू) वर भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विधान परिषदेतील शिवसेना (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अटल सेतूवर सक्षम आपत्कालीन यंत्रणा आणि हेलिपॅडसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नार्वेकर यांनी पत्रात केली आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील आडोशी येथे 3 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अति-ज्वलनशील प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. तब्बल 36 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या काळात वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे मुंबई–पुणे महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नसल्याचे स्पष्टपणे समोर आले, असे नार्वेकर यांनी नमूद केले आहे.

Atal Setu: अटल सेतूवरील आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अटल सेतूवरील आपत्कालीन व्यवस्थेचा सखोल आढावा घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील शिवडी येथून नवी मुंबईतील न्हावा शेवाला जोडणाऱ्या अटल सेतूची एकूण लांबी 21.8 किलोमीटर असून, त्यापैकी 16.5 किलोमीटर भाग समुद्रावर तर 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. हा सेतू 12 जानेवारी 2024 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Atal Setu: हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे 

अटल सेतूमुळे मुंबई–नवी मुंबई प्रवासाचा कालावधी एका तासावरून अवघ्या 20 मिनिटांपर्यंत कमी झाला असून, त्यामुळे या पुलावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय, अटल सेतूच्या आसपास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प सुरू असल्याने, येथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा अपघात, आग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे अटल सेतूवर सुसज्ज आपत्कालीन यंत्रणा, तातडीची मदत व्यवस्था आणि हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Atal Setu: अटल सेतूवर दुर्घटना घडली तर...

टँकर अपघाताच्या दिवशी आपण मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावरून बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जात होतो, आणि त्या वेळी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले. अशीच घटना अटल सेतूवर घडल्यास भीषण परिणाम होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा 

Dadar Market: दादरच्या मार्केटमध्ये फेरीवाल्यांना उठवण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी सायरन लावून रुग्णवाहिका फिरवली, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget