एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न

Devendra Fadnavis on gas Shortage in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक भागांंमध्ये गॅस टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एलपीजी सिलेंडरसाठी नागरिक रांगा लावताना दिसत आहेत

Devendra Fadnavis on gas Shortage in Maharashtra: राज्यातील गॅस टंचाई दिवसेंदिवस चिंताजनक स्वरुप धारण करत असल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारकडून राज्यातील एलपीजी गॅस पुरवठा दावा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीजकडून सिलेंडरचे (Gas cylinder) बुकिंग घेण्यात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. यामुळे घरातील गॅस संपण्याच्या भीतीने अनेकजण गॅस एजन्सीबाहेर (Gas Shortage) रांगा लावताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राज्यात गॅसची कोणतीही टंचाई नाही. केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवा, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते रविवारी राहुरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

देवेंद्र फडणवीसांनी गॅसच्या तुटवड्यावरुन चिंता करण्याचे कारण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत. पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. ही भीती पसरली तर लोक गॅसची साठवणूक करतील. केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधून येणारे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे आखाती देशांवर अवलंबून आहे. मात्र, आता ही रसदच बंद झाल्याने भारतात एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसचा तुटवडा जाण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी नागरिकांना अद्याप या दाव्यावर पूर्णपणे भरवसा नसल्याचे चित्र दिसत आहे.

Baramati Bypoll Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यांनी म्हटले की, बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा

अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
सोलापूरची जागा काँग्रेसला, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं दाखल केला अपक्ष उपेदवारी अर्ज, राजकीय घडामोडींना वेग
सोलापूरची जागा काँग्रेसला, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं दाखल केला अपक्ष उपेदवारी अर्ज, राजकीय घडामोडींना वेग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Embed widget