जळगाव : अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना 137 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यांनी केलेलं हे कृत्य म्हणजे चोरी नाही, तर शासनावर टाकलेला डाका असल्याचं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटल आहे. भोसरी प्रकरणात ही त्यांना दंड करण्यात आला असून, ही रक्कम त्यांना भरावीच लागणार आहे. तसेच खडसे यांच्या सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. तसेच, येत्या काही दिवसांत खडसेंनी हा दंड मुदतीत भरला नाही, तर त्यांच्या संपूर्ण मालमत्ता लिलाव केली जाण्याची शक्यताही महाजनांनी वर्तवली आहे. 


दरम्यान याबाबत बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, “ एकनाथ खडसेंनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन घेऊन, त्यातून मुरूम उत्खनन केले. मात्र, त्यांनी रॉयल्टी भरली नाही, कोट्यवधी रुपयांचा मुरूम विकला, सगळा पैसा काळया मार्गाने घेतला. त्यांनी याबाबत रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा ते देऊ शकले नाही. म्हणून त्यांना 137 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याबाबत हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे. 35 कोटी रुपयांचे दंड तातडीने त्यांस भरावा लागणार आहे. मात्र, त्यांनी तो भरला नाही म्हणून त्यांच्या सगळी मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले आहे. येत्या काही दिवसांत त्यांनी हा दंड मुदतीत भरला नाही, तर त्यांच्या संपूर्ण मालमत्ता लिलाव केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 


खडसे भ्रष्टाचाराचे कुलगुरू 


पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, “सत्ता असली की आपलं कोणी वाकड करू शकत नाही आणि गेली की काय होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या गोष्टी केल्या असल्या तरी देवेंद्र फडणीस आणि गिरीश महाजन नालायक कसा हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खडसेंच्या या कृत्यामुळे त्यांचा जावई जेलमध्ये जाऊन आला. स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचं उदाहरण आहे. खडसे नेहमी इतरांच्या भष्टाचार संदर्भात बोलतात, मात्र खडसे हे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत, आता त्यांना भोगावे लागत असल्याची टीका महाजन यांनी केली आहे. 


खडसेंना निवडणूक लढता येईल का?


आपण स्वच्छ असेल तरच इतरांना त्रास द्यावा आणि छळ करावा. आपण असे असतांना इतरांकडे बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे राहतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता होती तेंव्हा आमच्यावर मोका लावला होता, खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही तर असे काही केले नव्हते. त्यांनी उत्तर द्यावे त्यांनी मुरूम कुठे टाकला, जे पेरले तेच उगवणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. त्यांचाकडे सरकारी फी बाकी असल्याने त्यांना निवडणूक लढता येईल का? हे निवडणूक आयोग ठरवेल. कारण ग्राम पंचायतीची फी बाकी असली तरी निवडणूक लढता येत नाही, मात्र आपला कायद्याचा अभ्यास नाही, असे म्हणत खडसे यांच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवारी वरच बोट ठेवत महाजन यांनी टीकास्त्र सोडले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Eknath Khadse : "सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका": एकनाथ खडसेंचे टीकास्त्र