एक्स्प्लोर

Dhananjay Munde on Banjara: बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का, धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने ठिणगी, बंजारा तरुण संतापले, धनूभाऊ म्हणाले...

Dhananjay Munde on Banjara ST Reservation: धनंजय मुंडे यांनी वंजारी आणि बंजारा समाज एकच आहेत, असा आशयाचे वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे. बंजारा समाज संतापला.

Dhananjay Munde on Banjara ST Reservation: आज बंजारा समाजाला तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गाचे आरक्षण आहे. आम्हीसुद्धा तिकडे एसटी प्रवर्गातच आहोत. बंजारा आणि वंजारा (vanjari community) वेगवेगळे आहेत का, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी सोमवारच्या बंजारा समाजाच्या मोर्चावेळी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी बंजारा (Banjara Community) समाजाने केली आहे. वंजारी आणि बंजारा समाज एक नाहीत, असे बंजारा समाजाकडून ठामपणे सांगण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्या कालच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळीही घोषणाबाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याला मान्यता दिली होती. हैदराबाद गॅझेटमध्ये (Hyderabad gazette) बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्यामुळे आता बंजारा समाजाला महाराष्ट्रातही एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, अशातच धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने वादाची नवी ठिणगी पडली आहे. 

सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती (अ) (VJ-A) प्रवर्गाचे आरक्षण आहे. तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमाती (NT-D) या प्रवर्गाचे आरक्षण आहे. यासंदर्भात बोलताना हरीभाऊ राठोड यांनी म्हटले की, धनगर समाजाला आज भटक्या विमुक्त प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्यासाठी मी पुढाकार घेतला होता. वंजारी आणि बंजारा समाज वेगवेगळे आहेत. मी गोपीनाथ मुंडे यांचा स्वीय सहाय्यक असतानाही हीच भूमिका घेतली होती. मी साहेबांना सांगितलं होतं की, तुम्ही यामध्ये पडायचे नाही. तुम्हालाही माहिती आहे की, लमाण आणि वंजारी यांच्यात फरक आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यासंदर्भात बंजारा समाजातील तरुणांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच तुम्ही आमच्या ताटातील अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी त्यांचं वाक्य मागे घ्यावे. बंजारा आणि वंजारी समाजाची भाषा, रुढी, परंपरा, वेशभुषा सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. दोन्ही समाजांमध्ये काहीच जुळत नाही. पण धनंजय मुंडे यांनी या सगळ्याला वेगळे वळण लावण्याचे काम केले, असे बंजारा समाजातील तरुणांनी म्हटले.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे काय म्हणाले?

कोणी काय विरोध करावा, हे माझ्या हातात नाही. स्थानिक पातळीवर आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना आणि वागताना, वंजारा आणि बंजारा ही जात वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून, बंजारा समाजाने मुंडे साहेबांवर प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे. त्या बोलण्याचा कोणी काय अर्थ घ्यावा. अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे कोण होते, हे सुद्धा सोशल मीडियावर समोर आले आहे. कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं, काहीतरी झालं पाहिजे ना, अशी काही विघ्नसंतोषी लोकं आहेत, ते हे सगळे प्रकार करत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

जारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget