Devendra Fadnavis: आम्ही 'कोंबडा' मारत नाही, कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा. आम्ही 'कोंबडा' मारत नाही, कोंबडे मारणारे वेगळे. नागपूरमध्ये नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis: महारेलने 145 पुलांचा आराखडा आम्हाला दिलेला आहे. त्याला आम्ही मान्यता देत आहोत. जयस्वाल यांनी मला आश्वस्त केले आहे की, पुढील तीन वर्षांत आम्ही हे सर्व पूल बांधून दाखवू. सगळ्यांवरचा स्वाक्षरी (कोंबडा) एकाच वेळी मी मारणार आहे. एखादा पूल राहिलेला असेल, तर तोही टाकून द्या, आम्ही तोही पूल बांधून टाकू. आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो. कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते रविवारी नागपूरमध्ये (Nagpur news) विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. (Maharashtra Politics news)
आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, नऊ प्रकल्पांचे उद्घाटन एकाच वेळी आपण या ठिकाणी करत आहोत. याठिकाणी नागपूरचा हा पूल आहेच; तसेच सांगली, सातारा, अमरावती अशा विविध जिल्ह्यांतील नऊ प्रकल्पांचे आपण उद्घाटन केले. महारेलचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी विक्रमी वेळेत, उत्कृष्ट गुणवत्ता राखत ही सर्व नऊ कामे पूर्ण केली आहेत. या पुलाला आपण स्वर्गीय बहेरीनभाई यांच्या नावाने नाव दिले आहे. मी जेव्हा महापौर होतो, तेव्हा स्वर्गीय बहेरीनभाई यांनी उपमहापौर म्हणून माझ्यासोबत काम केले होते. आपल्या देशात दरवर्षी रेल्वे फाटकांमुळे सुमारे 21 हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे आपण निर्णय घेतला की, महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त राज्याचे चित्र निर्माण करायचे आहे. आज आधुनिक शहरातून या भागाकडे पाहता येते. एकेकाळी पूर्व नागपूरचा भाग तुलनेने मागे समजला जात होता. नितीनजी आणि आम्ही शहर, विदर्भ आणि महाराष्ट्र पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Farmers Loan Waiver: फडणवीस सरकारने कर्जमाफीतील महत्त्वाची अट काढून टाकली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबत राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
आणखी वाचा
Before You Go
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'






















