एक्स्प्लोर

ठाकरे बंधू एकत्र येणार? उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच, आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यानंतर मुंबईसह कोल्हापुरातील शिवसैनिक आणि मनसैनिक यांना अत्यंत आनंद झाला आहे. हे दोन्ही बंधू एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या सैनिकांची इच्छा आहे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतर पक्षांची चांगलीच अडचण होऊ शकते. ठाकरे हा ब्रँड काय आहे, हे महाराष्ट्राला दिसून येईल अशा शब्दात शिवसैनिक आणि मनसैनिक मनातील इच्छा बोलून दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात जोडत, आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढू आणि जिंकू असे म्हटले. 

उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणारं, माझा काय संबंध येतो. यांनी साथ द्यायची आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिला, त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण, काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला काय आहे, असं मला वाटत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो असेही फडणवीसांनी म्हटलं. 

लोकं विकास बघतात, लोकं आमच्यासोबत - लोढा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल, 'सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ' अशी डायलॉगबाजी करत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमुळे काय फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केलं. मनसे आणि शिवसेना एक होऊ द्या ना, पण लोकं विकास बघतात. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास बघतात. त्यामुळे लोक आमच्याबरोबर आहेत. भाजप हा स्वतःला राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणतो, राष्ट्राचे नियम आणि सिद्धांत आहे, त्याप्रमाणे आम्ही चालणार असे उत्तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.  

मुख्यमंत्री गडचिरोलीत, युनिटला अत्याधुनिक शस्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली पोलिसांच्या सी. सिक्सटी युनिटला रशियन बनावटीचे अत्याधुनिक शस्त्र देण्यात आले आहे. 172 असॉल्ट रायफल, 19 मशीन पिस्टल आणि भारतीय बनावटीच्या 300 खास बुलेटप्रूफ जॅकेट्स सी 60 च्या जवानांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अत्याधुनिक शस्त्रांमुळे गडचिरोली पोलिसांच्या सर्वात यशस्वी अशा C-60 युनिटची मार्क क्षमता आणखी वाढणार असून जंगलातील त्यांचे ऑपरेशन्स आणखी अचूक होतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात तेच होईल; एकनाथ शिंदेंनी हात जोडले, एकाच वाक्यात पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Mumbai Local Train Rain: देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Devendra Fadnavis On Maharashtra Rain: रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget