एक्स्प्लोर

Ashok Chavan : काँगेसच्या काळातही विकास झाला, मात्र गेल्या अकरा वर्षातील विकासाची गती अधिक: अशोक चव्हाण

Ashok Chavan : भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या काळात देखील विकास झाला मात्र गेल्या अकरा वर्षातील विकासाचा वेग अधिक असल्याचं म्हटलं.

नांदेड : भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारच्या काळातील विकास कामांची गती यावर भाष्य केलं. याशिवाय मुंबई नांदेड वंदे भारत संदर्भात देखील अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या काळात विकास झाला मात्र त्यापेक्षा दुपटीनं विकास झाला गेल्या अकरा वर्षात झाल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.  

अशोक चव्हाण काय म्हणाले ?

काँगेसच्या काळात विकास झाला,  मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. मी काँगेस मध्येच होतो. काँगेसच्या काळात विकास झाला नाही का या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे हे मला कळल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी मारला. काँगेसच्या काळात ही विकास झाला मात्र जो विकास मागच्या अकरा वर्षात झाला तो अधिक गतीने झाला, असं अशोक चव्हाण म्हणाले. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचं धोरण ठेवल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

वंदे भारतच श्रेय रावसाहेब दानवे यांचं : अशोक चव्हाण 

वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड पर्यंत वाढण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. या निर्णयानंतर नांदेड मध्ये श्रेयवाद सूरू आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड पर्यंत वाढण्याचा निर्णयाचे श्रेय तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आहे, असं  खासदार अशोक चव्हाण म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी यासाठी पाठपुरावा केला. जालना ते नांदेड पर्यंत रेल्वे लाईनचे काम सुरु होते. त्यामुळे तो निर्णय आता झाला . आता कोण श्रेय घेते मला माहीत नाही. रावसाहेब दानवे यांनी 2023 सालीच ही घोषणा केली होती. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असं अशोक चव्हाण म्हणाले. 

इतर पक्षातील नेत्यांना भाजपसोबत यावं वाटतं : अतुल सावे

भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो कामाचा लेखाजोखा आज जनतेसमोर मांडला आहे. हे बघून इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपसोबत यावं असं वाटतं असं अतुल सावे म्हणाले.  हे दोन्ही नेते देशाच्या विकासासाठी काम करतात म्हणून त्यांच्याबरोबर गेले पाहिजे असं त्यांना वाटतं, असं अतुल सावे म्हणाले. संजय राऊत सकाळी काय बोलतात ते रात्री त्यांना आठवत नाही, असंही अतुल सावे म्हणाले.  शनि देवस्थान येथील 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं त्यात 114 मुस्लिम होते. तो तिकडच्या ट्रस्टीचा विषय आहे, असं अतुल सावे म्हणाले.

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget