Anjali Damania, मुंबई : मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती एकूण 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई महापालिकेनं भरती प्रक्रियेत निश्चित केलेल्या काही अटींवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.  मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी घातलेल्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत, असं उमेदवारांचं मत आहे. परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी पहिल्या प्रयत्नात पदवी परिक्षा पास असणे बंधनकारक करण्यात आले. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट राज्यातील 9 मंत्री आणि आमदारांचं शिक्षण काढलं आहे. 




अंजली दमानिया यांचे ट्वीट जशेच्या तसे ?


मुंबई महानगर पालिकेत क्लर्क च्या भरती साठी इतक्या भरमसाठ अटी कशासाठी ? 


तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुला / मुलींना मिळत नसतात. झगडावं लगत त्यांना शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, नोकरीसाठी. 


10 वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? मी खाली काही उदाहरण दिली आहेत ती पाहा, अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत…..हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत. 


इंग्रक्जी व मराठी टाइपिंग आले पाहिजे ? BMC मधे टाइपरायटर आहेत तरी का ? आता सगळ्यांना कंप्यूटर टाइपिंग करावे लागते ना. 


प्रकल्पग्रस्त हा प्रकल्प ग्रस्त असतो, मुंबई - ठाण्यातील वेगळा नसतो. त्यांना समान संधी देणे अपेक्षित आहे. 


एक तर ही ९ तारीख पुढे ढकला आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून ह्या तीन अटी रद्द करा. 


भूषण गगरानी आणि अश्विनी जोशी ह्यांनी कृपया दाखल घ्यावी. 


दमानिया यांनी 9 आमदार-मंत्र्यांचं शिक्षण काढलं..


अजित पवार 10 वी पास


विजय वडेट्टीवार 10 वी पास


गिरीश महाजन SYBCom


शंभूराज देसाई SYBCom


भारत गोगवले 8 वी पास 


संदीपान भुमरे 10 वी पास 


धरामरावबाबा अत्राम 10 वी पास 


गुलाबराव पाटील 12 वी पास 


संतोष बांगर 4 थी पास 


हे सगळे महाराष्ट्र  चालवायला चालतात  , पण लिपिक भरतीमध्ये  10 व  पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट ? 


इतर महत्वाच्या बातम्या 


Narayan Rane : सांभाळून घ्या, तुम्हालाही मुलं आहेत, दिशा सालियनप्रकरणात उद्धव ठाकरेंनी मला फोन केला, नारायण राणेंचा दावा