एक्स्प्लोर

Maharashtra Gujarat Border Dispute : विधानसभेत मुद्दा उपस्थित आणि राज्याची यंत्रणा कामाला, गुजरात - महाराष्ट्राचा सीमावाद तरी मिटणार का?

Maharashtra Gujarat Border Dispute : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात डहाणू विधानसभेचे माकपाचे आमदार विनोद निकोले यांनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला होता.

Maharashtra Gujarat Border Dispute :  महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujarat) या राज्यातील सीमावाद ही सातत्याने समोर येत आहे.  गुजरात राज्यातील उंबरगाव येथील सोलसुंबा या ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप वेवजी गावातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर डहाणू (Dahanu) विधानसभेचे माकपाचे आमदार विनोद निकोले (Vinod Nikole) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता राज्याची यंत्रणा कामाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या भागाची पाहणी तहसीलदार आणि आणि उपायुक्तांनी केली असून त्यासंदर्भातले अहवाल त्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

जवळपास 2017 पासून गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून वारंवार महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच दोन्ही राज्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट बसण्याची परवानगी गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीने मागितली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जवळपास दीड किलोमीटर पर्यंत यी स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील 204 सर्व्हे नंबरवर गुजरातकडून अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप वेवजी ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. 

स्थानिकांना अतिक्रमणाचा त्रास

गुजरात राज्याची हद्द सुरु अशा आशयाचा बोर्ड असलेल्या जागेपासून अवघ्या पाचशे मीटर आधीपासून हे स्ट्रीट लाईट बसवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळामध्ये राज्याच्या सीमा बंद असताना देखील याचा मोठा फटका येथील स्थानिकांना बसल्याचं सांगण्यात येत आहे. तर सध्या या भागाचे सीमांकन निश्चित नसल्याने हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय वेवजी ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे. दरम्यान वेवजी ग्रामपंचायतीकडून सोलसुंबा गावाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शासनाला या भागातील सीमांकन करण्यासाठी पत्र देण्यात आलं असून पुढील गोष्टींचा पाठपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

नेमका काय आहे वाद ? 

या विषयी भूमी अभिलेख यांच्या मार्फत दोन्ही राज्यांचे सीमांकन निश्चित करावे लागणार आहे. त्यामध्ये पालघर आणि वलसाड जिल्हाधिकारी यांच्या यांच्या संगनमताने हा विषय मार्गी लावावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमा या  सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, भुमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या परवानगीने निश्चित करण्यात याव्यात ही मागणी देखील आता जोर धरत आहे. परिणामी या त्रिकोणी कोपऱ्याचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या जवळपास 1500 मीटर सीमेपर्यंत गुजरात राज्याचे अतिक्रमण झाले आहे. 

दरम्यान काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने शैक्षणिक सोईचे कारण सांगून  वेवजी ग्रामपंचायतीला पत्र देऊन स्ट्रीट लाईटचे खांब टाकले. मात्र ही स्ट्रीट लाईट गुजरातच्या इंडीया कॉलनीच्या रहिवाशांसाठी करण्यात आली असल्याचे वेवजीच्या ग्रामस्थांना लक्षात आले. त्यानंतर वेवजी ग्रामपंचायतीने  सोळसुंभा ग्रामपंचायतीला  महाराष्ट्राच्या हद्दीत उभारलेले वीजेचे खांब काढून टाकण्याबाबत खडसावले होते. दरम्यान सोळसुंभा ग्रामपंचायतीने वेवजी ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवत अतिक्रमण कायम ठेवले असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ही जागा आपली असल्याचा दावा सोलसुंबा रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime : भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं
भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं
Virar Attack : विरारमध्ये मंडल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट
विरारमध्ये मंडल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget