एक्स्प्लोर

Maharashtra Gujarat Border Dispute : विधानसभेत मुद्दा उपस्थित आणि राज्याची यंत्रणा कामाला, गुजरात - महाराष्ट्राचा सीमावाद तरी मिटणार का?

Maharashtra Gujarat Border Dispute : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात डहाणू विधानसभेचे माकपाचे आमदार विनोद निकोले यांनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला होता.

Maharashtra Gujarat Border Dispute :  महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujarat) या राज्यातील सीमावाद ही सातत्याने समोर येत आहे.  गुजरात राज्यातील उंबरगाव येथील सोलसुंबा या ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप वेवजी गावातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर डहाणू (Dahanu) विधानसभेचे माकपाचे आमदार विनोद निकोले (Vinod Nikole) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता राज्याची यंत्रणा कामाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या भागाची पाहणी तहसीलदार आणि आणि उपायुक्तांनी केली असून त्यासंदर्भातले अहवाल त्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

जवळपास 2017 पासून गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून वारंवार महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच दोन्ही राज्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट बसण्याची परवानगी गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीने मागितली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जवळपास दीड किलोमीटर पर्यंत यी स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील 204 सर्व्हे नंबरवर गुजरातकडून अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप वेवजी ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. 

स्थानिकांना अतिक्रमणाचा त्रास

गुजरात राज्याची हद्द सुरु अशा आशयाचा बोर्ड असलेल्या जागेपासून अवघ्या पाचशे मीटर आधीपासून हे स्ट्रीट लाईट बसवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळामध्ये राज्याच्या सीमा बंद असताना देखील याचा मोठा फटका येथील स्थानिकांना बसल्याचं सांगण्यात येत आहे. तर सध्या या भागाचे सीमांकन निश्चित नसल्याने हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय वेवजी ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे. दरम्यान वेवजी ग्रामपंचायतीकडून सोलसुंबा गावाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शासनाला या भागातील सीमांकन करण्यासाठी पत्र देण्यात आलं असून पुढील गोष्टींचा पाठपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

नेमका काय आहे वाद ? 

या विषयी भूमी अभिलेख यांच्या मार्फत दोन्ही राज्यांचे सीमांकन निश्चित करावे लागणार आहे. त्यामध्ये पालघर आणि वलसाड जिल्हाधिकारी यांच्या यांच्या संगनमताने हा विषय मार्गी लावावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमा या  सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, भुमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या परवानगीने निश्चित करण्यात याव्यात ही मागणी देखील आता जोर धरत आहे. परिणामी या त्रिकोणी कोपऱ्याचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या जवळपास 1500 मीटर सीमेपर्यंत गुजरात राज्याचे अतिक्रमण झाले आहे. 

दरम्यान काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने शैक्षणिक सोईचे कारण सांगून  वेवजी ग्रामपंचायतीला पत्र देऊन स्ट्रीट लाईटचे खांब टाकले. मात्र ही स्ट्रीट लाईट गुजरातच्या इंडीया कॉलनीच्या रहिवाशांसाठी करण्यात आली असल्याचे वेवजीच्या ग्रामस्थांना लक्षात आले. त्यानंतर वेवजी ग्रामपंचायतीने  सोळसुंभा ग्रामपंचायतीला  महाराष्ट्राच्या हद्दीत उभारलेले वीजेचे खांब काढून टाकण्याबाबत खडसावले होते. दरम्यान सोळसुंभा ग्रामपंचायतीने वेवजी ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवत अतिक्रमण कायम ठेवले असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ही जागा आपली असल्याचा दावा सोलसुंबा रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Vasai Virar Rain Flood News: वसई-विरारमध्ये महापुराचा कहर; आजही जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान, 48 तासांत काय काय घडलं?
वसई-विरारमध्ये महापुराचा कहर; आजही जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान, 48 तासांत काय काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Embed widget