एक्स्प्लोर

नाशकात द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या; वीजतोडणी केल्यामुळे आत्महत्या केल्याचा स्वाभिमानीचा आरोप, उर्जामंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शनिवार पासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा बसला असून निफाड, दिंडोरी, मालेगाव आणि बागलाण तालुक्याला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे.

नाशिक : अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या एका द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची वीजतोडणी केली गेली होती. अवकाळी पाऊस आणि वीजतोडणी यात चिंतेत होते. त्यामुळेच उर्जामंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडगाव मधील बाळासाहेब बाबूराव ठूबे या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने शनिवारी संध्याकाळी आपल्या द्राक्ष बागेतच विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. वर्षभर दिवसरात्र मेहनत घेत, नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी बाग उभी केली होती. त्यांच्या दीड एकर बागेतील एक एकर द्राक्षांची काढणी बाकी होती. अशातच शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि नैराश्यात आलेल्या बाळासाहेबांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे वीजबिलाच्या थकबाकीमुळे या परिसरात विजतोडणी करण्यात आल्याने बाळासाहेबांच्या चिंतेत अधिकच भर पडल्याचं नातेवाईक सांगत आहे. बाळासाहेबांच्या आत्महत्येला ऊर्जामंत्री आणि महावितरण अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.

शनिवार पासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा बसला असून निफाड, दिंडोरी, मालेगाव आणि बागलाण तालुक्याला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. 5 हजार 702 हेक्टर वरील पिके जमिनोदस्त झाली असून 7 हजार 521 शेतकऱ्याचं नुकसान झाल आहे. यात द्राक्ष आणि कांदा पिकांना यात सर्वाधिक फटका बसलाय.

आधीच कोरोनाचा वाढत धोका त्यानंतर लॉकडाऊनचा फटका, इंधनासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेली मजुरी आणि व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार या सर्व गोष्टींमुळे बळीराजा हवालदील झालाय. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत सरकारने साथ देणं गरजेचं असतानाच सरकारही पाठ फिरवत असल्याने, यानंतरची पुढची पिढी शेती करणार नाही अशी भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान कोरोनाचं संकट राज्य सरकारच्या नाकी नऊ आणत असतानाच राज्यावर आता अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. रविवारपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

अवकाळी पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार असल्याची चिन्हं आहेत. याशिवाय अनेक गावातल्या आठवडी बाजारांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. फक्त कोल्हापूर, मावळच नव्हे तर वाशिममध्येही जिल्ह्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढत असल्याची चिन्हं होती. त्यातच आता अवकाळी पावसामुळं हवेत तात्पुरता गारवा आला आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांचा आरोग्यावरही थेट परिणाम होणार आहे. त्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Pune Crime Khalil Shaikh: खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget