एक्स्प्लोर

नाशकात द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या; वीजतोडणी केल्यामुळे आत्महत्या केल्याचा स्वाभिमानीचा आरोप, उर्जामंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शनिवार पासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा बसला असून निफाड, दिंडोरी, मालेगाव आणि बागलाण तालुक्याला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे.

नाशिक : अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या एका द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची वीजतोडणी केली गेली होती. अवकाळी पाऊस आणि वीजतोडणी यात चिंतेत होते. त्यामुळेच उर्जामंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडगाव मधील बाळासाहेब बाबूराव ठूबे या द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने शनिवारी संध्याकाळी आपल्या द्राक्ष बागेतच विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. वर्षभर दिवसरात्र मेहनत घेत, नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी बाग उभी केली होती. त्यांच्या दीड एकर बागेतील एक एकर द्राक्षांची काढणी बाकी होती. अशातच शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि नैराश्यात आलेल्या बाळासाहेबांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे वीजबिलाच्या थकबाकीमुळे या परिसरात विजतोडणी करण्यात आल्याने बाळासाहेबांच्या चिंतेत अधिकच भर पडल्याचं नातेवाईक सांगत आहे. बाळासाहेबांच्या आत्महत्येला ऊर्जामंत्री आणि महावितरण अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.

शनिवार पासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा बसला असून निफाड, दिंडोरी, मालेगाव आणि बागलाण तालुक्याला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. 5 हजार 702 हेक्टर वरील पिके जमिनोदस्त झाली असून 7 हजार 521 शेतकऱ्याचं नुकसान झाल आहे. यात द्राक्ष आणि कांदा पिकांना यात सर्वाधिक फटका बसलाय.

आधीच कोरोनाचा वाढत धोका त्यानंतर लॉकडाऊनचा फटका, इंधनासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेली मजुरी आणि व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार या सर्व गोष्टींमुळे बळीराजा हवालदील झालाय. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत सरकारने साथ देणं गरजेचं असतानाच सरकारही पाठ फिरवत असल्याने, यानंतरची पुढची पिढी शेती करणार नाही अशी भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान कोरोनाचं संकट राज्य सरकारच्या नाकी नऊ आणत असतानाच राज्यावर आता अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. रविवारपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

अवकाळी पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार असल्याची चिन्हं आहेत. याशिवाय अनेक गावातल्या आठवडी बाजारांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. फक्त कोल्हापूर, मावळच नव्हे तर वाशिममध्येही जिल्ह्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढत असल्याची चिन्हं होती. त्यातच आता अवकाळी पावसामुळं हवेत तात्पुरता गारवा आला आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांचा आरोग्यावरही थेट परिणाम होणार आहे. त्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget