एक्स्प्लोर

नाशिकला वादळाचा जोरदार शॉक, बुधवारपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

आधीच लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका सहन करणाऱ्या महावितरणला आता निसर्ग वादळाचा जोरदार शॉक बसला आहे. एकंदरीतच महावितरणला सध्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

नाशिक : निसर्ग वादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यालाही चांगलाच बसला असून बुधवारी संध्याकाळी वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाने नाशिक हादरुन गेलं होतं. एकामागे एक अनेक झाडे कोसळत होती, काही झाडांच्या फांद्या घरांवर जाऊन पडत होत्या तर काही थेट विजेच्या तारांवर आणि याचाच परिणाम म्हणून बुधवारपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नाशिक शहरातील शिखरेवाडी परिसरात एका विजेच्या खांबावर अचानक एक भला मोठा वृक्ष उन्मळून पडलं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने शिखरेवाडी परिसरातील हजारो नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मुलांना अभ्यासात अडचणी येत असून साधा मोबाईलही चार्ज करता येत नाही. रात्रही अंधारात काढावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. महावितरणने तात्काळ काम पूर्ण करावीत, अशी मागणी या परिसरातील रहिवासी करत आहेत.

महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रीजपालसिंह जनवीर यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार आधीच कोरोनाचा धोका आणि आता धडकून गेलेल्या निसर्ग वादळामुळे महावितरणला सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. वादळाचा नाशिक परिमंडळातील (नाशिक आणि नगर जिल्हा) 119 सबस्टेशनला फटका बसला असून तब्बल 2,552 विद्युत खांब कोसळले आहेत, यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. शुक्रवारी (5 जून) संध्याकाळपर्यंत 10 लाख ग्राहकांपैकी 8 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

आपला जीव धोक्यात घालून महावितरणचे कर्मचारी सध्या काम करत असून सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर आमचे प्रयत्न सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच महावितरण मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. ग्राहकांकडे पैसाच नाही, त्यातच महावितरणनेही सुरक्षेच्या कारणास्तव वसुली मोहीम बंद केली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात 90 टक्के तर एप्रिलमध्ये आमचे फक्त 40 ते 45 टक्केच टारगेट पूर्ण झाले आहे. महिन्याला नाशिक महामंडळाची सरासरी 450 कोटी एवढी वसुली होत असते.

एकट्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महावितरणला वादळाचा जोरदार शॉक बसला असून रायगड आणि कोकणपट्ट्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. खरं पाहिलं तर महावितरणचे सर्व कर्मचारी हे देखील योद्धेच आहेत. कोरोनाविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून तेही लढा देत आहेत. कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेत ऊन असो पाऊस असो किंवा वादळ ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आता निसर्ग वादळामुळे उद्भववलेली परिस्थितीही पूर्ववत करण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही या सर्व गोष्टीचा विचार करत महावितरणला सहकार्य करण्याची सध्या गरज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget