एक्स्प्लोर

नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना?

दिवाळी होताच नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रिकामे होत चाललेल्या कोविड सेंटरबाहेर पुन्हा रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतयं. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.

नाशिक : 23 नोव्हेंबरपासून नववी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील शाळा, कॉलेजेस प्रत्यक्षपणे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.

नाशिक जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सर्व शिक्षकांना अँटीजन टेस्ट करणे अनिवार्य असून काही प्रमाणात लक्षणे असलेल्या शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. तसेच शाळांमध्ये पालकांच्या लेखी संमतीने 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने शाळांची स्वच्छता, नियमित सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या सर्व गोष्टींचं पालन करण्यात यावं, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील देखील शाळा सुरू होणार असल्याने या भागातही कोविडबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

नाशिकमध्ये साडेआठ महिन्यानंतर शाळांची प्रवेशद्वार काल खुली करण्यात आली. साफसफाई तसेच सॅनिटायझेशनच्या कामालाही वेग आला आहे. 23 तारीख कधी उजाडेल याची विद्यार्थ्यासोबतच शिक्षक देखिल वाट बघताय, मात्र असे असले तरी नाशिक शहराच्या मेरी परिसरातील सिडीओ मेरी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सध्या चिंतेत आहेत. या शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर महापालिकेचे कोरोना कोविड सेंटर आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये 25 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच रोज शेकडो संशयित रुग्ण येथे कोरोनाची चाचणी करण्यासाठी दाखल होत असतात. यासोबतच शाळेच्या आवारातही संशयित रुग्णांचा वावर बघायला मिळतो. ही सर्व परिस्थिती बघता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व खबरदारी घेऊ असं जरी शाळा प्रशासन सांगितलं असलं तरी पालकांसोबतच शिक्षकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

सिडीओ मेरी शाळेत नववी आणि दहावीचे मिळून एकूण 927 विद्यार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 10 टक्के विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचं संमतीपत्र दिल असून सुरक्षेच्या कारणास्तव इतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाही. कोविड सेंटरची जागा बदलल्याशिवाय मुलांना आम्ही शाळेत पाठवणार नाही अस उत्तर अनेक पालकांनी शाळा प्रशासनाला दिलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय ते विद्यार्थीही शाळेत जाण्यासाठी तयार नाहीत. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना, दुसरीकडे शाळा सुरु करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय योग्य नसल्याचं मत पालक व्यक्त करतायत.

खरं बघितलं तर दिवाळी होताच नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रिकामे होत चाललेल्या कोविड सेंटरबाहेर पुन्हा रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतयं. सर्व परिस्थितीत शाळा सुरु झाल्यास किती पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सीडीओ मेरी सारखी शाळा सुरु करून सरकार आणि स्थानिक प्रशासन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर घालत नाहीयेत ना ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

गर्दीने लावली वाट, आता कोरोनाची दुसरी लाट? दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात निर्बंध वाढले
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अखेर एपस्टीन फाईलमध्ये नाव येताच बिल गेटस यांची मोठी कबुली; म्हणाले, 'होय माझे दोन रशियन महिलांसोबत संबंध होते, मला एपस्टीनबाबत माझ्या पहिल्या पत्नीने सांगितल्यानंतरही....'
अखेर एपस्टीन फाईलमध्ये नाव येताच बिल गेटस यांची मोठी कबुली; म्हणाले, 'होय माझे दोन रशियन महिलांसोबत संबंध होते, मला एपस्टीनबाबत माझ्या पहिल्या पत्नीने सांगितल्यानंतरही....'
UIDAI Google Map : अधिकृत आधार केंद्र आता गुगल मॅपवर, यूआयडीएआय आणि गुगलची भागीदारी, 60 हजार केंद्र गुगल मॅपवर दिसणार
अधिकृत आधार केंद्र आता गुगल मॅपवर, यूआयडीएआय आणि गुगलची भागीदारी, 60 हजार केंद्र गुगल मॅपवर दिसणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Shivsena vs BJP in BMC | विकासकामांसाठी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार Special Report
Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर एपस्टीन फाईलमध्ये नाव येताच बिल गेटस यांची मोठी कबुली; म्हणाले, 'होय माझे दोन रशियन महिलांसोबत संबंध होते, मला एपस्टीनबाबत माझ्या पहिल्या पत्नीने सांगितल्यानंतरही....'
अखेर एपस्टीन फाईलमध्ये नाव येताच बिल गेटस यांची मोठी कबुली; म्हणाले, 'होय माझे दोन रशियन महिलांसोबत संबंध होते, मला एपस्टीनबाबत माझ्या पहिल्या पत्नीने सांगितल्यानंतरही....'
UIDAI Google Map : अधिकृत आधार केंद्र आता गुगल मॅपवर, यूआयडीएआय आणि गुगलची भागीदारी, 60 हजार केंद्र गुगल मॅपवर दिसणार
अधिकृत आधार केंद्र आता गुगल मॅपवर, यूआयडीएआय आणि गुगलची भागीदारी, 60 हजार केंद्र गुगल मॅपवर दिसणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची घोषणा
मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची घोषणा
मुंबई महापालिकेच्या सभागृहात गोंधळ; काँग्रेस नगरसेवक आक्रमक, महापौरांच्या दिशने धावले
मुंबई महापालिकेच्या सभागृहात गोंधळ; काँग्रेस नगरसेवक आक्रमक, महापौरांच्या दिशने धावले
MSRTC NCMC Card : एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचाय, NCMC कार्ड बंधनकारक, कार्डसाठी किती रुपये लागणार? बीडमध्ये प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचाय, NCMC कार्ड बंधनकारक, कार्डसाठी किती रुपये लागणार?
Amol Mitkari: मुंबई पोलिसांनी तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप, अमोल मिटकरी संतापले, म्हणाले, 'बाबासाहेबांचा भीमाचा कायदा...'
मुंबई पोलिसांनी तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप, अमोल मिटकरी संतापले, म्हणाले, 'बाबासाहेबांचा भीमाचा कायदा...'
Embed widget