एक्स्प्लोर

बदलत्या हवामानाचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका; टोमॅटो, द्राक्ष पीक संकटात

बदलत्या हवामानामुळे नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो, द्राक्ष या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो.

नाशिक : बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागलाय. सकाळी धुकं आणि त्यानंतर ढगाळ हवामान असल्यान टोमॅटो, द्राक्ष अशा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी हातातलं पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे कांद्यानंतर यावेळी टोमॅटोलाही चांगला भाव मिळत होता. मात्र, आता रोगांमुळे हे पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात टोमॅटोचे भाव तेजीत होते. कांद्यापाठोपाठ टोमॅटोही भाव खात होता. मात्र, आता हाच टोमॅटो आता जणावर खाऊ लागले आहेत. 60/70 रुपये किलो दराने मिळणारा टोमॅटो 2/3 रुपये किलोपर्यंत खाली घसरला आहे. नाशिक जिल्ह्यात गिरणारे गावात टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या बाजारातून देशातच नाही तर परदेशातही टोमॅटो जात असतो. मात्र, आज हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परतीच्या पावसाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यापुढे पुन्हा अस्मानी संकट येऊन उभं आहे. लाखो रुपये खर्च करुन वाढवलेलं पीक हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आलीय. गेल्या आठदहा दिवसापूर्वी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली. त्यामुळे कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, अचानक ढगाळ हवामान आल्यानं त्याचा फटका पिकांना बसू लागलाय. पहाटे दाट धुकं, त्यानंतर ढगाळ हवामान असल्यान शेती पिकांवर रोग पडायला सुरुवात झालीयं. पान जळून गेली असून पिकांची वाढही खुंटली आहे. हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे एकनाथ खडसेंकडून स्वागत! जी स्थिती टोमॅटोची तीच द्राक्ष बागांची होत आहे. सुर्यप्रकाश मिळत नसल्यानं करपा डवण्यां रोग पडायला सुरुवात झालीयं. मनी गळत असून पानही करपू लागली आहेत. लाखो रुपये खर्च केलेली बाग आता डोळ्यांदेखत उध्वस्त होत असल्यान कर्जमाफीपेक्षा वीज बिल माफ करावे, खत औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे. पुढचा एक दोन महिना शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने कमाईचा राहणार होता. मात्र, निसर्गापुढे शेतकरी हवालदील आहे. सरकारकडून मदत मिळत नसल्यानं अस्मानी आणि सुलतानी संकटाना तोंड देता देता नाशिकचा शेतकरी हवालदील झालाय. त्यातच पुन्हा पाऊस पडला तर शेतकरी उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होतेय. कांद्याचा भाव उतरला - तब्बल 100 रुपये किलोपर्यंत गेलेल्या कांद्याचा भाव आता उतरला आहे. बाजारात आवाक वाढल्याने कांद्याचा भाव किलोमागे 50 ते 60 रुपये झाला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने कांद्याच्या दरात सारखा चढउतार सुरू आहे. दरम्यान, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचा भाव गेल्या मागील आठवड्यापासून हळूहळू खाली येऊ लागला आहे. हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
फडणवीस म्हणाले, नाहीतर तुम्हीच माझं नाव बदला; सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार
Embed widget