एक्स्प्लोर

Ajit Pawar : बिहार राज्य करू शकतो तर महाराष्ट्र का नाही जातीय जनगणनेवरून अजित पवार स्पष्ट बोलले!

Ajit Pawar: बिहार सारखे राज्य करू शकतो तर महाराष्ट्र सरकारने देखील जातीनिहाय जनगणना करावी. असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे म्हटले.

नाशिक :  बिहार राज्याने जातीनिहाय जनगणना केली, तशी महाराष्ट्राने करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण हीच भूमिका आहे, की बिहार सारखे राज्य करू शकतो तर महाराष्ट्र सरकारने देखील जातीनिहाय जनगणना करावी. यासाठी बिहार राज्यातील अशी माहिती मागवली असून बिहारचा डेटा यशस्वी झाला असेल, तर त्या रस्त्याने जाण्याचा महायुती विचार करेल, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. आज सायंकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जनगणना करावी का? या प्रश्नांला सकारात्मकपणे उत्तर देत महायुती याबाबत विचार करेल असं सांगितलं. यासाठी बिहार राज्याने केलेल्या जातीनिहाय जनगणनेची माहिती मागविण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही सरकारमध्ये असताना विधानसभेचे अध्यक्षांनीच असा प्रस्ताव सभागृहात मांडला होता.  त्यावेळी सभागृहाच्या सर्वच सदस्यांनी एकमताने त्याला पाठिंबा दिला होता. आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तो ठराव झालेला आहे, तो ठराव आपणवर पाठवलेला आहे. परंतु केंद्राकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, आता दुसरा प्रस्ताव असा पुढे आलेला आहे. केंद्राची मदत न घेता बिहार राज्याने जातीनिहाय जनगणना केली तशी महाराष्ट्राने करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण हीच भूमिका आहे की बिहार सारखे राज्य करू शकतो. तर, महाराष्ट्र सरकारने देखील जातीनिहाय जनगणना करावी. परंतु ते करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. हे खर्चिक आहे, मात्र एकदाच समाजातील सर्व घटकाला कळलं पाहिजे की नक्की कोण किती आहे? मागे कधीतरी जातीनिहाय जनगणना झाली, हे मला तरी आठवत नाही. मध्यंतरी केंद्र सरकारने केली होती,  त्यानंतर केंद्राने सांगितले की यामध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत. त्यामुळे ती बाहेर देणं आम्हाला योग्य वाटत नसल्याचे केंद्र सरकार म्हणाले होते. त्यामुळे जात निहाय जनगणना करायची ठरल्यास बिहारचा डेटा यशस्वी झाला असेल, यासाठी बिहारची माहिती मागवली आहे तर त्या रस्त्याने जाण्याचा महायुती विचार करेल असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान राज्यातील आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तो त्याला संविधानाने, कायद्याने, घटनेने दिला आहे. फक्त तो कायद्याच्या चौकटीत बसून द्यावा लागतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आरक्षण देण्यात आलं होतं. दुर्दैवाने आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण दिलं होतं. त्यांचं हायकोर्ट टिकला मात्र सुप्रीम कोर्टात टिकला नाही, असा दोन वेळा आरक्षणाच्या बाबतीत अनुभव आलेला आहे. आता नव्याने आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे, हे करत असताना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने ज्या अटी नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये तज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन कसा मार्ग काढता येईल. कारण आपल्या महाराष्ट्र मध्ये 52 टक्के आणि संपूर्ण देशामध्ये आर्थिक दृष्ट्या दहा टक्के देण्यात आले आहे. त्यामुळे एकूण जवळपास 62 टक्के आरक्षण मिळालेला आहे. त्यामुळे पुढचं आरक्षण द्यायचं म्हटलं तर आत्ता मिळालेला आरक्षण आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं सर्वपक्षीय नेत्यांचं म्हणणं असल्याचे अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget