एक्स्प्लोर

Nashik BJP : 'देवेंद्र फडणवीसांमुळे 15 दिवसांत आरक्षण मिळालं', नाशिकच्या भाजप कार्यालयासमोर जल्लोष

Nashik BJP : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 100 टक्के मार्गदर्शनामुळे ओबीसी समाजाला (OBC Reservation) राजकीय आरक्षण मिळाल्याची प्रतिक्रिया गिरीश पालवे (Girish Palve) यांनी व्यक्त केली.

Nashik BJP : ओबीसी राजकीय आरक्षण (OB Reservation) लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल भाजप कार्यालय नाशिक (Nashik) येथे भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. 

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने बांठिया अहवाल (Banthiya Report) मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच जल्लोष आता पुणे, नाशिक, पंढरपूर, उस्मानाबादसह संपूर्ण राज्यभरात साजरा केला जात आहे. ओबीसी बांधव एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत आहेत.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजपच्या वतीने आज शहर कार्यालयात ओबीसी आरक्षण मिळाल्याचा जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palave) म्हणाले कि, ओबीसी राजकीय आरक्षण लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने वेळकाढू पण केला. मात्र आताच्या सरकराने पंधरा दिवसात आरक्षणाचा मोकळा करून दिल्याने ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या दरम्यानचा काळात अनेक पक्षांनी यासाठी जोरदार निदर्शने केली जात होती. त्याचे श्रेय देखील पक्ष घेत आहेत. त्यात भाजपदेखील असून पक्षाच्या वतीने अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आली होती. मात्र आता ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पेढे वाटून, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला आहे. 

नाशिक भाजपच्या वतीने भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे भाजपचे शहर पदाधिकारी यावेळी उत्साहात होते. यावेळी ढोल ताशा वाजवून पेढे वाटून ओबीसी आरक्षणाचा आनंद साजरा करण्यात आला. त्याचबरोबर अनेकांनी ढोल ताशांच्या गाजरावर ताल धरत आनंद व्यक्त केला आहे.

15 दिवसांत ओबीसी समाजाला न्याय मिळाला : गिरीश पालवे 
खऱ्या अर्थाने एवढी आंदोलने करण्याची वेळ यायला नको होती. मध्यप्रदेश सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने चार दिवसात आरक्षण मिळाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला पंधरा दिवसात आरक्षण मिळाले आहे. अन राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते हे आरक्षण आमच्यामुळे मिळाले. मात्र हे साफ चुकीचं असून त्यांना फक्त नाटक करायचं होत. त्यामुळे इतका वेळ जात होता आणि आंदोलने करावी लागत होती. आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या 100 टक्के मार्गदर्शनामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले असल्याची प्रतिक्रिया गिरीश पालवे यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget