नाशिक : पुण्यातील लोणावळा (lonavala) येथे पावसाळी पर्यटनादरम्यान एका कुटूंबातील पाच जणांचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कुठलही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावसाळी पर्यटनाच्या (Monsoon Tourism) ठिकाणी नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) निर्बंध जारी करण्यात आले. धरण क्षेत्रातील धबधबे, भावली धरण (Bhavali Dam), गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरासह त्र्यंबक, इगतपुरी परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या प्रतिबंधित आदेशाला पर्यटकांकडून केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.  


पावसाळी पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगाही उगारला जाणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले होते. इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरातील धरण क्षेत्रामध्ये विकेण्डला पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यावर अनेक डोंगर रांगातील धबधबे कोसळू लागतात आणि ते पावसाळी पर्यटकांना आकर्षित करीत असतात. मात्र यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले. 


दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? 


त्यातच भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली आहे. आपला जीव धोक्यात घालून पर्यटक धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी भावली धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या प्रतिबंधित आदेशालाच पर्यटकांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. लोणावळ्याच्या घटनेवरून पर्यटक व प्रशासन कोणतेही बोध घेताना दिसत नसल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.  


पर्यटन स्थळांवर पोलिसांचे पथक तैनात करणार 


दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणे, जीव धोक्यात घालून निसरड्या वाटेवर धबधब्यांवर गर्दी करणे, यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध लावत दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांचे पथक पर्यटन स्थळांवर तैनात करणार असल्याचे सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Weather Forecast : मुंबईत वादळी वारा अन् अतिमुसळधार, कोल्हापूर, साताऱ्यात रेड अलर्ट; पावसाचा लेटेस्ट अंदाज काय?


Bhavali Dam : भावली धरणात डुबकी मारणं बेतलं जीवावर, नाशिकच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत