एक्स्प्लोर

OBC Reservation : ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका : देवेंद्र फडणवीस

OBC Reservation : ओबीसी समाजाला राज्य सरकारच्या वतीने आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर : "ओबीसी समाजाला (OBC) राज्य सरकारच्या वतीने आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाच्या मनात आमचं आरक्षण कमी होईल अशी जी भीती आहे, तसा कुठलाही हेतू राज्य सरकारचा नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज मनात ठेवू नये," अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी समाजाला आरक्षण अबाधित राहण्याबद्दल आश्वासन दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या आहेत. तर इतर मराठा संघटनाच्याही काही मागण्या आहेत. त्यामुळे सर्वांचा एकत्रित विचार करुन राज्यात यावर राजकारण न करता, समाजाच्या हितासाठी निर्णय होणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून सर्वांनी मिळून प्रश्न सोडवण्याकरता मार्ग काढावे असे आवाहनही त्यांनी केले.

'...तर तोडगा काढणे शक्य'

आरक्षणासारख्या मुद्द्यावर निर्णय करताना राज्य सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही विचार करावा लागतो. प्रश्न सोडवायचे असेल, तर पुढे ते कायद्याच्या चौकटीत टिकलेही पाहिजे, अन्यथा समाजाला सरकारने आपली फसवणूक केली असे वाटेल असेही फडणवीस म्हणाले. सरकारचा प्रयत्न आणि विश्वास आहे की, सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केला तर यावर तोडगा काढणे शक्य होईल आणि प्रश्न सुटतील. 

मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्याशी बोलले आहेत..

सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलले आहेत. लोकशाहीमध्ये उपोषण करणे, आपले प्रश्न लावून धरणे याला शंभर टक्के मान्यता आहे. लोकशाहीमध्ये ती एक पद्धत आहे. सर्व समाजातील नेत्यांनी कोणतेही वक्तव्य करताना कुठलाही समाज दुखावणार नाही याचा विचार केला पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करु नये : ओबीसी समाज

ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा समाज बांधवांना आरक्षण द्या. ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करु नये, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे. तर मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण दिले तर ओबीसी समाज आणि मराठा समाजात संघर्ष होऊ शकतो, अशी चिंता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे.  

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे. हे लक्षात ठेवून दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही. यासाठी सरकारने मध्य मार्ग निवडावा. मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा अशी आमची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
Dr. Babanrao Taywade: छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Nagpur DJ Ban Controversy: 'तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच!' नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान, आता डीसीपी राहुल मदने बडकस चौकांत पोहचले
'तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच!' नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान; आता डीसीपी राहुल मदने बडकस चौकांत पोहचले

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget