एक्स्प्लोर

मुंबईच्या टोल नाक्यावरील पिवळी पट्टी गायब, टोलच्या नियमांची पायमल्ली; कोल्हापुरात मात्र वेगळं चित्र

शंभर मीटर वर एक पिवळी पट्टी आखून त्या पट्टी पर्यंत रांग गेल्यास सर्वांना टोल न घेता सोडावे असा हा नियम आहे.

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या टोल नाक्यांवर शंभर मीटरच्या पिवळ्या पट्टीचा नियम लागू केला आहे. फास्ट टॅग सिस्टम आणून देखील टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असतील तर शंभर मीटर वर एक पिवळी पट्टी आखून त्या पट्टी पर्यंत रांग गेल्यास सर्वांना टोल न घेता सोडावे असा हा नियम आहे. 

मात्र महाराष्ट्रात राज्य सरकारच्या एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यूडीच्या असलेल्या टोलनाक्यांवर आधीपासूनच हा नियम लागू आहे. त्याचे पालन मात्र कोणी करत नाही. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाशी, ऐरोली, दहिसर, मुलुंड, आनंदनगर आणि मुलुंड एलबीएस रोड या ठिकाणी एम एस आर डी सी चे टोल नाके आहेत. तिथे देखील या शंभर मीटरच्या नियमाचे पालन केले जात नाही. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही मुंबईच्या आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या महत्त्वाच्या आनंद नगर टोल नाका येथे जाऊन पडताळणी केली असता तिथे पिवळ्या रंगाची पट्टीच नसल्याचे दिसून आले. तसेच टोलनाक्यापासून 100 मीटर पेक्षा पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या मात्र सर्वांकडून टोल वसूल केला जात होता. या नियमाला बगल देता यावी यासाठी टोल घेणाऱ्या कंपनीने टोल नाके पुढे-मागे केलेले आहेत. त्यामुळे मुख्य टोलनाक्यापासून शंभर मीटर अंतर कुठे मोजावे हेच लक्षात येत नाही.

टोल नाक्यावर गाडी 10 सेकंदांपेक्षा जास्त थांबू नये यासाठी NHAI च्या गाईडलाईन्स जारी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लागू केलेल्या पिवळ्या पट्टीच्या नियमाचे आम्हीदेखील काटेकोरपणे अंमलबजावणी करू असे एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र हा नियम आधी पासूनच लागू असल्याचे लक्षात आणून दिल्यावर, जर या नियमाचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाईचे आदेश देऊ असे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूरात चित्र वेगळं

कोल्हापूरात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. जिथं वाहनांची ही रांग शंभर मीटरच्या आत येत नाही तोपर्यंत टोल घेता येणार नाही, असा नियम आहे. फास्टटॅग प्रणाली बंधनकारक केल्यानंतर देखील तांत्रिक कारणांमुळे अनेक टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे आता केवळ दहा सेकंदांमध्ये टोलनाक्यावरून गाडी पास होईल अशी व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. त्याच अनुषंगाने ही नवीन मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत.

...तर टोल नाक्यांना पेनल्टी बसणार का ? 

टोलनाक्यावर 100 मीटर पेक्षा जास्त रांगा असल्या तरी वाहन टोल न फाडता सोडून देण्यात येतील असा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे, या निर्णयाचे वाहनचकांनी स्वागत केलं असलं तरी  गर्दीच्या वेळी 10 सेकंदात वाहन पास होईल हे कसे मोजणार, जर 10 सेकंद पेक्षा जास्त वेळ लागला तर टोल नाक्याला पेनल्टी बसणार का असा सवाल वाहनचक उपस्थित करत आहेत. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget