एक्स्प्लोर

मुंबईच्या टोल नाक्यावरील पिवळी पट्टी गायब, टोलच्या नियमांची पायमल्ली; कोल्हापुरात मात्र वेगळं चित्र

शंभर मीटर वर एक पिवळी पट्टी आखून त्या पट्टी पर्यंत रांग गेल्यास सर्वांना टोल न घेता सोडावे असा हा नियम आहे.

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या टोल नाक्यांवर शंभर मीटरच्या पिवळ्या पट्टीचा नियम लागू केला आहे. फास्ट टॅग सिस्टम आणून देखील टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असतील तर शंभर मीटर वर एक पिवळी पट्टी आखून त्या पट्टी पर्यंत रांग गेल्यास सर्वांना टोल न घेता सोडावे असा हा नियम आहे. 

मात्र महाराष्ट्रात राज्य सरकारच्या एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यूडीच्या असलेल्या टोलनाक्यांवर आधीपासूनच हा नियम लागू आहे. त्याचे पालन मात्र कोणी करत नाही. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाशी, ऐरोली, दहिसर, मुलुंड, आनंदनगर आणि मुलुंड एलबीएस रोड या ठिकाणी एम एस आर डी सी चे टोल नाके आहेत. तिथे देखील या शंभर मीटरच्या नियमाचे पालन केले जात नाही. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही मुंबईच्या आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या महत्त्वाच्या आनंद नगर टोल नाका येथे जाऊन पडताळणी केली असता तिथे पिवळ्या रंगाची पट्टीच नसल्याचे दिसून आले. तसेच टोलनाक्यापासून 100 मीटर पेक्षा पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या मात्र सर्वांकडून टोल वसूल केला जात होता. या नियमाला बगल देता यावी यासाठी टोल घेणाऱ्या कंपनीने टोल नाके पुढे-मागे केलेले आहेत. त्यामुळे मुख्य टोलनाक्यापासून शंभर मीटर अंतर कुठे मोजावे हेच लक्षात येत नाही.

टोल नाक्यावर गाडी 10 सेकंदांपेक्षा जास्त थांबू नये यासाठी NHAI च्या गाईडलाईन्स जारी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लागू केलेल्या पिवळ्या पट्टीच्या नियमाचे आम्हीदेखील काटेकोरपणे अंमलबजावणी करू असे एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र हा नियम आधी पासूनच लागू असल्याचे लक्षात आणून दिल्यावर, जर या नियमाचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाईचे आदेश देऊ असे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूरात चित्र वेगळं

कोल्हापूरात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. जिथं वाहनांची ही रांग शंभर मीटरच्या आत येत नाही तोपर्यंत टोल घेता येणार नाही, असा नियम आहे. फास्टटॅग प्रणाली बंधनकारक केल्यानंतर देखील तांत्रिक कारणांमुळे अनेक टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे आता केवळ दहा सेकंदांमध्ये टोलनाक्यावरून गाडी पास होईल अशी व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. त्याच अनुषंगाने ही नवीन मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत.

...तर टोल नाक्यांना पेनल्टी बसणार का ? 

टोलनाक्यावर 100 मीटर पेक्षा जास्त रांगा असल्या तरी वाहन टोल न फाडता सोडून देण्यात येतील असा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे, या निर्णयाचे वाहनचकांनी स्वागत केलं असलं तरी  गर्दीच्या वेळी 10 सेकंदात वाहन पास होईल हे कसे मोजणार, जर 10 सेकंद पेक्षा जास्त वेळ लागला तर टोल नाक्याला पेनल्टी बसणार का असा सवाल वाहनचक उपस्थित करत आहेत. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
Mumbai Crime News: 'मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार'; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
'मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार'; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Ritu Tawde: रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Embed widget