एक्स्प्लोर

SEBC कायद्यानुसार नव्या नियुक्त्यांसाठी आधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या थेट रद्द करु नका : हायकोर्ट

2014 मध्ये राज्य सरकारने मराठा कोट्यातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेत 12 जुलै रोजी तसा अध्यादेश जारी केला. त्यामुळे गेली पाच वर्षे शासकीय सेवेत काम केलेल्या सुमारे 2700 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या एसईबीसी कायद्यानुसार नवी भरती प्रक्रिया राबवण्याआधी आधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या थेट रद्द करु नका, अन्यथा अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (23 जुलै) राज्य सरकारला दिला आहे. ज्याला उपस्थित सरकारी वकिलांनीही सहमती दर्शवत, पुढील सुनावणीपर्यंत याची अंमलबाजवणी करणार नाही अशी हमी हायकोर्टाला दिली आहे. त्यामुळे साल 2014 च्या जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत विविध पदांवर भरती झालेल्या सुमारे 2700 सरकारी कर्मचाऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.  सुनीता नागणे यांनी यासंदर्भात अॅड. रमेश बदी आणि अॅड. सी.एम. लोकेश यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने, दोन आठवड्यांनी होणाऱ्या पुढील सुनावणीत राज्याच्या महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ही सूचना देताना मराठा आरक्षणासंदर्भातील एसईबीसी कायद्याची अमंलबजावणी करताना ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही याचीही खबरदारी घ्या, या सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांची आठवण करुन दिली. खूशखबर! मराठा आरक्षणाचे पहिले लाभार्थी सार्वजनिक बांधकाम विभागात, नियुक्त्या जाहीर काय आहे अध्यादेश? 2014 मध्ये राज्य सरकारने मराठा कोट्यातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेत 12 जुलै रोजी तसा अध्यादेश जारी केला. त्यामुळे गेली पाच वर्षे शासकीय सेवेत काम केलेल्या सुमारे 2700 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागणार आहे. त्यांच्याजागी मराठा समाजातील नव्या उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश सर्व शासकीय-निमशासकीय विभाग आणि कार्यालयांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने 'एसईबीसी' आरक्षण अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करुन ते विधीमंडळात मंजूर करुन घेतलं. मात्र, त्या कायद्यालाही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. तरीही राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून, सरकारी नोकरभरतीत मराठा कोट्यातील जागांवर खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला. तसंच अंतिम निकाल लागेपर्यंत आधीच्या तात्पुरत्या नियुक्त्याही कायम ठेवल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्य सरकारने 'एसईबीसी' आरक्षणाचा नवीन कायदा केला. त्यालाही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, हायकोर्टाने 27 जून 2019 रोजी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय देऊन हा कायदा वैध ठरवला. या कायद्यानुसार आधीचा साल 2014 चा कायदा रद्द करत सामान्य प्रशासन विभागाने 12 जुलै रोजी नव्या नियुक्तीबाबत हा अध्यादेश काढला. आघाडी काळात रखडलेल्या मराठा समाजातील मुलांना न्याय, खुल्या वर्गातल्या उमेदवारांचे भवितव्य टांगणीला यामुळे होणार काय? 9 जुलै 2014 ते 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीत सरकारी सेवेतील प्रलंबित ठेवलेली निवड प्रक्रिया 'एसईबीसी' आरक्षणासह पूर्ण करण्यात येणार आहे. तसंच 'एसईबीसी'साठी  आरक्षित असलेल्या पदांवर केलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या तात्पुरत्या नियुक्त्या संपुष्टात आणून, त्या जागी 'एसईबीसी'मधील उमेदवारांच्या निवडसूचीनुसार नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Mumbai Rains Latest Upates: पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget