एक्स्प्लोर

Shivsena UBT: ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब; मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा उलगडणार

Shivsena UBT: आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचे मार्गदर्शन आदित्य ठाकरे सोमवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यात करणार आहेत.

मुंबई: सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं, अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) करणार आहेत. मुंबईच्या मतदार याद्यातील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उघड करणार असल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली असून त्यात प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीने करण्यात आला आणि आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचे मार्गदर्शन आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सोमवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यात करणार आहेत.

Shivsena UBT: मुंबईच्या मतदार यादीमधील घोटाळा उलगडून सांगणार 

या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नेते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत. वरळी डोम येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे. आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात मोठा बॉम्ब फोडणार आहेत. मुंबईच्या मतदार यादीमध्ये असलेला घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत.

Shivsena UBT: विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात बरेचसे बाहेरचे मतदार घुसवले

मतदार यादीतच दोष असतील तर निवडणुकीला अर्थ राहत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत याबद्दल पुराव्यासह सांगितले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने आवाज उठवला आहे. मतदार यादीमधील घोळाबाबत आयोगाकडे शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी तक्रारी व पाठपुरावा करूनही काहीच कारवाई झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात बरेचसे बाहेरचे मतदार घुसवण्यात आल्याचे शिवसेनेने निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवूनही काहीच पावले उचलली गेली नाहीत.

Shivsena UBT: महापालिका निवडणुकीत त्याआधारे बोगस मतदान होऊ नये

बिहारच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीची छाननी केल्यानंतर 7 कोटी 90 लाख मतदारांची ती यादी स्वच्छ करून 7 कोटी 24 लाखापर्यंत आली आहे. म्हणजेच सुमारे 48 लाख बोगस मतदार त्यातून वगळले गेले. मुंबईतही शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली. त्यात प्रचंड घोळ दिसला असून तो कशा पद्धतीचा आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीत त्याआधारे बोगस मतदान होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल आदित्य ठाकरे या निर्धार मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत. या मेळाव्यात आणखी काय नवी माहिती आदित्य ठाकरे सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget