एक्स्प्लोर
Advertisement
जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो, मुंबईच्या सुरक्षेकडेही लक्ष द्या : शिवसेना
मुंबई : जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात उत्सव साजरा केला जातोय. जीएसटीमुळे जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेनेने जीएसटीला पाठिंबा दिला आहे. 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून जकात नाके ओसाड पडले आहेत. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील जकात चौक्या आणि पोलीस हटवल्याने मुंबईला सुरक्षेचं भगदाड पडलं आहे. या भगदाडात घुसून कुणी घातपात घडवू नये, अशी चिंता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईची काळजी घ्या. हा जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये, यासाठी शिवसेना सरकारला सावध करत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून जकात नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे. वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील सर्वच जकात नाके बंद झाले आहेत.
1 जुलैला सकाळी उठल्यानंतर या 10 गोष्टी माहित असू द्या….
या जकात नाक्यांच्या माध्यमातून महापालिकांच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत होता. पण, आता जीएसटी लागू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वपूर्ण स्त्रोत बंद झाला आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून देशात एक देश एक कर लागू झाला. संसदेतील कार्यक्रमात मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदीच्या हस्ते जीएसटी लाँच करण्यात आला. देश आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिली. संबंधित बातम्या: जीएसटीचं लोकार्पण, देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कर प्रणालीत बदल जीएसटी म्हणजे ‘गुड अँड सिंपल टॅक्स’ : पंतप्रधान मोदी जीएसटीमुळे देशातील महागाई कमी होणार : अरुण जेटली जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion