एक्स्प्लोर

50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपने सरकार बनवावं, फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं : आठवले

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच, 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे. भाजपशी युती झाल्यास शिवसेनेचाच फायदा होईल. 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, असं रामदास आठवले म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेचाच फायदा गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली. राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असं त्यांचं म्हणणं. परंतु माझं मत आहे की शिवसेनेने भाजपसोबत यावं आणि रिपाइंला सोबत घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करावं. शिवसेनेला केंद्रात मंत्रिपदं मिळतील. असं झाल्यास मला आनंद होईल.

मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं खरंतर 50-50 फॉर्म्युल्यावरुनच शिवसेना-भाजपची युती तुटली होती. त्यात रामदास आठवले यांनी पुन्हा 50-50 फॉर्म्युला मांडला आहे. याविषयी त्यांनी विचारलं असता ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांची इच्छा असेल तर त्यांना आणखी एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं. उरलेली तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं सत्तेत 50-50 टक्के वाटा ठेवावा आणि केंद्रात वाटा घ्यावा. अशा पद्धतीने मार्ग निघू शकेल असं मला वाटतं."

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्युहात अडकू नये उद्धव ठाकरें काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रव्युहात अडकू नये. त्या चक्रव्युहात अडकल्यामुळे त्यांना काही करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं एकत्र आल्यास फायदा होणार आहे, महाराष्ट्राचं भलं होणार आहे. केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील, असंही आठवले म्हणाले.

आता महाराष्ट्राचा नंबर महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहेत. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, "पाच वर्ष टिकेल असं ते म्हणत असतील तरी टिकायला हवं. पण ते टिकायला हवं ना. मध्य प्रदेशचं सरकार गेलं. राजस्थान थोडक्यात हुकलं आणि महाराष्ट्राचा नंबर आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजप-शिवसेना एकत्र आले तर चांगलंच आहे."

शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं असंही रामदास आठवले म्हणाले. "शरद पवार यांना विनंती आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएमध्ये आलं पाहिजे. त्यांना केंद्रात सत्ता मिळेल. शिवसेना आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं आधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो. पवारांना भविष्यात सत्तेत संधी मिळू शकते. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेते एनडीएमध्ये आले तर नरेंद्र मोदींना त्यांची साथ मिळेल आण देशाच्या विकासासाठी फायदा होईल," असं आठवले यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांना दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate : सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Embed widget