एक्स्प्लोर

मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट, एनसीबीचे समीर वानखेडे यांचं मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

Sameer Wankhede Letter To Mumbai CP: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून खोट्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Sameer Wankhede Letter To Mumbai CP: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे. समीर वानखेडे यांनी हे पत्र अशावेळी लिहिले आहे, जेव्हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावी याच्या अंगरक्षकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

प्रभाकर साईलचा दावा
मुख्य साक्षीदार असलेला पी गोसावीच्या अंगरक्षकाने या प्रकरणात मोठा खुलासा केल्याने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा पेपर असल्याचे सांगत कोऱ्या कागदावर बळजबरीने स्वाक्षरी घेतल्याचे बॉडीगार्ड प्रभाकरने नोटरीकृत प्रतिज्ञापत्रात सांगितले. वास्तविक क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेबद्दल त्याला जास्त माहिती नव्हती. प्रभाकर हे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात केपी गोसावींव्यतिरिक्त आणखी एक साक्षीदार आहेत.

प्रभाकरने सांगितले की, तो किरण गोसावीचा खाजगी अंगरक्षक म्हणून काम करतो. क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी ते गोसावी यांच्यासोबत होते. या घटनेनंतर किरण गोसावी रहस्यमयपणे गायब झाल्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे, असे प्रभाकरने सांगितलंय.

प्रभाकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, तो एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसूझाला भेटला. त्यावेळी ते के.पी.गोसावींना भेटायला आले होते. लोअर परळ जवळील बिग बाजार जवळ NCB कार्यालयातून दोघेही आपापल्या कारमध्ये पोहोचले. त्याने शपथपत्रात दावा केलाय की गोसावी हे सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटी रुपयांनी सुरुवात करुन 18 कोटींमध्ये फिक्स करण्यासाठी बोलत होते. ते समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये देण्याबाबतही बोलले आहे.

यानंतर निळ्या रंगाची मर्सिडीज कार लोअर परेलला पोहोचते ज्यात शाहरुख खानची सेक्रेटरी पूजा ददलानी होती. कारमध्ये केपी गोसावी आणि सॅम यांची पूजा ददलानीसोबत भेट झाली.

15 मिनिटांनी तिथून मंत्रालयाच्या दिशेने निघालो. पी.गोसावी कोणाशी तरी फोनवर बोलतात आणि तेथून वाशीच्या दिशेने निघून जातात, वाशीला पोहोचल्यानंतर गोसावी यांनी मला सांगितले की तू इनोव्हा गाडीने ताडदेवला जा, एखाद्या व्यक्तीकडून 50 लाख रुपये रोख घे, मी पैसे घेतले आणि वाशीला पोहोचल्यानंतर त्याने ती बॅग किरण गोसावीला दिली.

नवाब मलिक यांची एसआयटी चौकशीची मागणी
आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईलच्या खुलाश्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी याची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली जात होती. चौकशी झाली तर अनेक मोठे खुलासे होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.

नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीच्या साक्षीदाराने ज्या प्रकारे खुलासा केलाय तो गंभीर आहे. समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी चित्रपट उद्योगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले. करोडो रुपये वसूल करण्याचे काम केले जात होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget