एक्स्प्लोर

नरिमन पॉईंट, कफ परेड, मंत्रालयसह बराच भाग 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार, BMC आयुक्तांना इशारा

कफ परेड, नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह 80 टक्के परिसर पाण्याखाली जाईल, म्हणजे गायबच होईल. 2050 म्हणजे 25-30 वर्ष फार लांब नाहीत, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.   

मुंबई : वातावरण बदलाचा (Climate Change) परिणाम येत्या काळात मुंबईतही जाणवणार असं अनेक तज्ज्ञांकडून बोललं जातं. आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही इशारा दिला की, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण मुंबईचा बराचसा परिसर 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल.  यामध्ये मुंबईची शान असलेला नरिमन पाँईट, मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. 

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल 27 ऑगस्ट रोजी शुक्रवारी मुंबई हवामान बदल नियोजनाबाबतच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं. याच कार्यक्रमात इकबाल सिंह चहल बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटलं की दक्षिण मुंबईतल्या ए, बी, सी आणि डी वॉर्डाचा 70 टक्के भाग हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांमुळे पाण्याखाली जाईल.

निसर्ग इशारा देत आहे पण नागरिकांना काही जाग येत नाहीये. मात्र हीच स्थिती काय राहिली तर परिस्थिती गंभीर होईल. कफ परेड, नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह 80 टक्के परिसर पाण्याखाली जाईल, म्हणजे गायबच होईल. 2050 म्हणजे 25-30 वर्ष फार लांब नाहीत, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.  

मुंबई किनारपट्टीवर 'निसर्ग' सारखं चक्रीवादळ129 वर्षांत पहिल्यांदा धडकलं. त्यानंतर मात्र गेल्या 15 महिन्यांत तीन चक्रीवादळं मुंबई किनारपट्टीवर आली. 5 ऑगस्ट 2020 रोजी नरिमन पॉईंटजवळ पाच-साडेपाच फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. त्यामुळे निसर्गाकडून संकेत मिळत आहेत, ते आपण ओळखून योग्य पावलं उचलली पाहिजेत. तसं न झाल्यास त्याचे परिणाम पुढच्या पिढीला नाही, तर आताच्या पिढीलाही भोगावे लागतील. हवामानबदलासाठी स्वतःचं नियोजन तयार करून त्यावर काम करणारं मुंबई  हे दक्षिण आशियातलं पहिलं शहर आहे,' असंही चहल यांनी स्पष्ट केलं.

दोन महिन्यांपूर्वी मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. मुंबईत 6 आणि 7 जूनदरम्यान मान्सून दाखल होतो. मात्र यावेळ वादळामुळे 17 मे रोजीच 214 मिमी पाऊसाची नोंद झाली. 9 जूनपूर्वी, मुंबईत जूनच्या 84 टक्के पावसाची नोंद झाली आणि जुलैमध्ये, महिन्याच्या सरासरीच्या 70 टक्के पाऊस फक्त चार दिवसांत 17 ते 20 जुलै दरम्यान झाला,  ही स्थिती भयानक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Anjali Damania and Ajit Pawar: पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर अंजली दमानियांचे खळबळजनक आरोप, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी, अमित शाहांकडे जाण्याची तयारी
24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर... अंजली दमानियांनी अमित शाहांना मेल धाडला, म्हणाल्या...
Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Embed widget