एक्स्प्लोर

नगरसेवक नसल्याने मुंबईकर हैराण! समस्या अनेक मात्र करणार काय?

प्रशासकांमुळे माजी नगरसेवक आपल्या प्रभागांतील कामांसाठी थेट निधी मागू शकत नाहीत आणि त्यांना तसा निधीदेखील मिळत नाही. त्यामुळे विभागातल्या पाणी, गटार, अशा समस्यांसाठी सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेचा कालावधी संपून एक वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्याप नवीन नगरसेवकच नसल्याने मुंबईतल्या अनेक भागात समस्याच समस्या सध्या आहेत अन् त्यामुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत.  देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई... याच मुंबई महापालिकेचा कालावधी संपून दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्याप या महापालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. यामुळे मुंबईत 227 माजी नगरसेवक आणि त्यांच्या विभागातील जनता ही अनेक समस्यानी हैराण आहेत .

मुंबई महापालिकेचा कालावधी संपल्याने 2022 मार्चला प्रशासनाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. प्रशासक नेमल्यानंतर प्रभागांतील कामे थांबलीत असे नाही. मात्र त्यावर बऱ्याच अंशी मर्यादा आहेत . प्रशासकांमुळे माजी नगरसेवक आपल्या प्रभागांतील कामांसाठी थेट निधी मागू शकत नाहीत आणि त्यांना तसा निधीदेखील मिळत नाही. त्यामुळे विभागातल्या पाणी, गटार, अशा समस्यांसाठी सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.

 नगरसेवक नसल्याने मुंबईत काय समस्या आणि अडचणी आहेत?

 -पाणी वेळेवर येत नाही व पाणी अशुद्ध येते 
-पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइनची समस्या 
-नालेसफाई
-पालिका उद्यानात खुर्च्या नाहीत
- व्यायामाची साधने नाहीत
-तातडीने रस्ते दुरुस्ती होत नाहीय
 -उद्याने- बागांचा विकास रखडलाय
-गटारांची सफाई नाही व झाकणे बसवली जात नाहीत
-रस्त्यात टाकलेला मातीचा ढिगारे पडले आहेत
-मूलभूत सोयी सुविधा असणारे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न होत नाहीत
- झाडांची पडझड वाढलीय
- ड्रेनेज लाइन तुंबले आहेत
-रस्त्यावर सांडपाणी
बंद पथदिवे
-सार्वजनिक स्वच्छतागृह यासह रस्त्यावर पडलेले खड्डे दुरूस्ती 

मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभाग आहेत. या सर्व प्रभागातील नगरसेवकांची मुदत 2022 मार्च रोजी संपलेली आहे. प्रशासक असल्याने समस्या घेऊन माजी नगरसेवक हक्काने जाऊ शकत नाहीत, गेले तरी निधी मिळत नाही. तसेच अनेक उपाययोजना करण्यासाठी स्थायी समिती व विविध समित्या देखील नसल्याने कोणत्याही प्रकल्पासाठी किंवा निधीसाठी देखील प्रयत्न करता येत नाही त्यामुळे विभागातले लोक मदत मागण्यासाठी येतात मात्र लोकप्रतिनिधी दोन्ही बाजूने कात्रीत अडकलेले आहेत.

 मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्याच प्रकारे मुंबई आणि लगतच्या परिसरातील महापालिकांची  देखील हीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच कोणत्या महापालिकांचा कालावधी संपलेला आहे आणि कुठे समस्या आहेत पाहुयात 

महानगरपालिका - नगरसेवकसंख्या - संपलेला कालावधी

  • मुंबई महापालिका - 227 - मार्च 2022
  • ठाणे महापालिका -132 - मार्च 2022
  • नवी मुंबई महापालिका - 111 - मे 2020
  • कल्याण-डोंबिवली महापालिका - 122 - नोव्हेंबर 2020
  • पनवेल महापालिका - 78 - जुलै 2022 
  • मिरा-भाईंदर महापालिका - 95- ऑगस्ट 2022
  • वसई-विरार महापालिका - 102 - जून 2020
  • उल्हासनगर महापालिका - 78 - एप्रिल 2022
  • भिवंडी-निजामपूर महापालिका - 90 - जून 2022

मुंबई महापालिकेत मार्फत गेल्या वर्षभरात प्रकल्पांवर पैसे खर्च झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतं मात्र 227 प्रभागात विकासकामांसाठी तेवढ्या प्रमाणात निधी खर्च होत नसल्याने अनेक मूलभूत समस्याही कायम आहेत . त्यामुळे मुंबईकरांच्या या समस्या सोडवायच्या असतील तर पुढील काळात लवकर महापालिका निवडणुका लागायला हव्यात तरच यावर तोडगा निघू शकतो. त्यामुळे आता आगामी काळात मुंबई महापालिका आणि या इतर निवडणुका कधी लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Embed widget