एक्स्प्लोर

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईची पोलखोल; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका तर मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Mumbai Rain : मुंबईत मॅनहोलमध्ये उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असून त्याची चौकशी झाली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईतील (mumbai rain update) नालेसफाईचा फज्जा उडाल्याचं चित्र असून अंधेरीसह इतर भागात कमरेपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. 

देर आये दुरुस्त आये, या म्हणीप्रमाणे ओढ घेतलेल्या पावसाने शनिवारी मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठलं होतं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. तर अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या होत्या. 

मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलीय. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका महिलेला अशाच प्रकारे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. काही चार चाकी वाहनांच्या टायरच्या लेव्हलपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळालं.

Aditya Thackeray On BMC : काय म्हणाले अदित्य ठाकरे?

मुंबईतील नालेसफाईवरीन आदित्य ठाकरेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईमध्ये काल अनेक ठिकाणी पाणी भरले. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, पण नालेसफाई झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मुंबई मनपाने काळजी घ्यायला हवी होती. एका ठिकाणी इमारत कोसळली, लोकांच्या जीविताशी खेळ सुरू असून याची चौकशी झाली पाहिजे.  गोवंडीत मॅनहोलमध्ये उतरलेले दोन कामगार गुदमरून मेले, त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून काम करायला पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून मॉनिटरिंग करण्यास कोणी नाही. त्यामुळे प्रशासक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 

दरम्यान आज मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये पुढचे सलग चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
Embed widget