एक्स्प्लोर

मुंबई विभागाच्या दहावी-बारावी बोर्डाच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासणीचं काम पूर्ण

मुंबईत कोरोनाची गंभीर स्थिती असताना देखील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत दहावीच्या आणि बारावीच्या 85 टक्के उत्तरपत्रिकांच्या सबमिशनचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात आणि राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आलं. मात्र लॉकडाउनच्या काळात दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले होते. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या आणि रेड झोन असलेल्या मुंबईत विविध आव्हानांचा सामाना करत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विभागाचे निकालाचे काम प्रगतीपथावर असून उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. यानंतर आता निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.

कोरोनामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागेल याबाबत अद्याप निश्चित काहीही सांगता येत नाही. राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळापैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि मॉडरेटरचे मोठे आव्हान मुंबई विभागासमोर उभे राहिले होते. मात्र राज्य सरकारच्या मदतीने आणि पोस्टाच्या सहकार्याने हे आव्हान मुंबई विभागाने पेलले आहे. जवळपास सर्वच उत्तरपत्रिका परीक्षकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान बोर्डाने पूर्ण केले आहे.

मुंबई विभागीत झालेल्या उत्तरपत्रिकेच्या सबमिशनची आकडेवारी

ठाणे 95 टक्के पालघर 95 टक्के रायगड 93 टक्के मुंबई 45 टक्के

मुंबई विभागातून परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी संख्या

दहावी - 3,91,991 बारावी - 3,39,014

मुंबई विभागाने आपल्या कामाची सुरुवात पालघर जिल्ह्यांपासून करत नंतर रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराकडे वळवले. मुंबईत आणि मुंबई बाहेर अडकलेल्या तपासणीकांपर्यंत उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी त्यांच्या आपत्तकालीन पासची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व व्यवस्था मुंबई विभागीय मंडळाने राज्य सरकार, शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण केली. यासाठी मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरची देखील वाढ केली. ज्याचा फायदा झाल्याची माहिती मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली. आतापर्यंत दहावीच्या आणि बारावीच्या 85 टक्के उत्तरपत्रिकांच्या सबमिशनचे काम पूर्ण झाले आहे.

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ उपलब्ध करण्यापासून ते खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवण्याचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर होते. मात्र राज्य मंडळाच्या मदतीने आणि मुंबई विभागाच्या कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे हे काम आम्ही करू शकलो आहे', असे संगवे यांनी सांगितले. आता मुंबईचे आवाहन लवकरच पूर्ण करायचे असून यासाठी मुंबईत येत्या 15 आणि 16 जूनला उत्तरपत्रिकांच्या सबमिशनच्या कामाला सुरुवात करणार आहोत. ज्याला परीक्षक आणि मॉडरेटरने उत्तम प्रतिसाद देण्याचे आवाहन संगवे यांनी केले आहे.

Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, पुण्यातील शिक्षण संस्थांची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
Embed widget