एक्स्प्लोर

खातेनिहाय आकडेवारी : कोणत्या मंत्रालयाने वर्षभरात किती निधी खर्च केला?

सगळ्यात जास्त रक्कम शालेय शिक्षण विभागाने 66% खर्च केली आणि सगळ्यात कमी सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त 9% रक्कम खर्च केली.

मुंबई : गेल्यावर्षी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या बजेट पैकी आजपर्यंत फक्त 41% निधी खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर शेतकरी कर्जमाफीसाठी घोषित केलेल्या रक्कमेपैकी फक्त 38% रक्कमच खर्च करण्यात आल्याचे ही स्पष्ट झालं आहे. या वर्षात अर्थ खात्याने चार परिपत्रक काढून खर्च करु नये, असा इशारा इतर विभागांना दिला होता. 26 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. 9 मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वर्ष 2018-19 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. पण वर्ष 2017-18 मध्ये अर्थसंकलपात ज्या तरतुदी केल्या, त्यापैकी फक्त 41% रक्कम खर्च झाल्याची माहिती आहे. सगळ्यात जास्त रक्कम शालेय शिक्षण विभागाने 66% खर्च केली आणि सगळ्यात कमी सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त 9% रक्कम खर्च केली. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना सरकार फक्त घोषणा करत आणि तेवढी रक्कम खर्च करत नसल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे राज्य सरकारने 32 हजार कोटींची कर्जमाफी घोषित केली. पण प्रत्यक्षात कर्जमाफीवर फक्त 12 हजार 249 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे फक्त 38% रक्कम खर्च झाली. समर्थन अर्थसंकल्प अध्ययन विभागाने केलेल्या अभ्यासात या गोष्टी आढळून आल्या. सरकारने अनेक घोषणा केल्या, पण त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने वर्ष 2017-18 मध्ये राज्य सरकारने चार परिपत्रक काढली आणि सर्व विभागांना विविध योजना राबवू नये, नोकरभरती करु नये आशा सक्त सूचना दिल्या. एप्रिल, जुलै, ऑगस्ट आणि जानेवारी 2018 अशा चार महिन्यात परिपत्रक काढून खर्च नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विभागनिहाय तरतूद आणि खर्च : शालेय शिक्षण विभाग तरतूद - 48 हजार 968 कोटी बजेट खर्च - 34 हजार पाच कोटी (म्हणजे 66% निधी खर्च) महिला व बालकल्याण विभाग  तरतूद - 3109 कोटी खर्च - 1906 कोटी (म्हणजे 58% निधी खर्च) सार्वजनिक आरोग्य तरतूद - 10 हजार 755 कोटी खर्च - 6747 कोटी (म्हणजे 60% निधी खर्च) ग्रामीण विकास तरतूद - 19 हजार 163 कोटी खर्च -10,539 कोटी (म्हणजे 50% निधी खर्च) सार्वजनिक बांधकाम विभाग तरतूद - 15 हजार 336 कोटी खर्च - 6289 कोटी (म्हणजे 9 % निधी खर्च) सामाजिक न्याय विभाग तरतूद - 13 हजार 413 कोटी खर्च - 6905 कोटी (म्हणजे 46% निधी खर्च) आदिवासी विकास  तरतूद - 11 हजार 110 कोटी खर्च - 4169 कोटी (म्हणजे 30% निधी खर्च) सरकारने शेतकरी कर्जमाफी घोषित केली, ती सहकार आणि पणन विभागातून निधी उपलब्ध करुन दिला. त्या विभागाचे बजेट होते 35 हजार 236 कोटी, पण खर्च झाला 14 हजार 215 कोटी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साठी 31 हजार कोटींची तरतूद होती, पण प्रत्यक्षात 12,429 कोटी इतकाच निधी खर्च झाला. म्हणजे एकूण 38% रक्कम खर्च झाली. म्हणजे 62% रक्कम अजून खर्च झाली नाही. यातून सरकार नुसती घोषणा करते, पण अजून मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. इतकंच नाही तर शेतकरी कर्जमाफिसाठी आदिवासी विभागाचे दोन हजार कोटी रुपये वळते करण्यात आले होते. पण त्यापैकी एकही रुपये ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांना देण्यात आलेली नाही.
  • शेतकरी कर्जमाफी- 31 हजार कोटी तरतूद
  • आतापर्यंत खर्च – 12 हजार 429 कोटी
राज्यात सध्या पायाभूत सोयी सुविधांसाठी शहरी भागात अनेक प्रकल्प सुरु आहेत. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. असं असताना सामाजिक क्षेत्रासाठी केला जाणाऱ्या खर्चाला कात्री लावली जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील कुपोषण, बालमृत्यू, शाळा बंद करणे, आरोग्याच्या समस्या या मूलभूत गोष्टींकडे सरकारच दुर्लक्ष होत असल्याची टीका आता होत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Mumbai Family death Watermelon: मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे 'फुड पॉयझनिंग'ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज
मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे 'फुड पॉयझनिंग'ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Embed widget