एक्स्प्लोर

वीस आठवड्यांनंतर जर गर्भवतीच्या जीवाला गंभीर धोका असेल, तर गर्भपाताला आमच्या परवानगीची गरज नाही - हायकोर्ट

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे पालनपोषण करण्याची आर्थिक परिस्थिती अनेकदा पालकांकडे नसते. अशा वेळी राज्य सरकारने या मुलांचे पालकत्व स्वीकारायला हवे, असेही न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे.

मुंबई : जर 20 आठवड्यांहून अधिक दिवसांची गर्भवती असलेल्या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आणि तिच्या जीवाला धोका निर्माण करणारी असेल, तर तिच्या गर्भपाताचा निर्णय नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांनी घ्यावा. आमच्या परवानगीची आवश्‍यकता नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र ही मुभा केवळ आणि केवळ महिलेच्या जीवाला अत्यंत धोका असेल, तरच विचारात घेतली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जर इच्छा नसतानाही बाळाचा जन्म झाला आणि त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्‍यकता असेल तर त्यासाठी रुग्णालयांनी योग्य ते उपचार करावेत. अशा प्रकरणांमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे पालनपोषण करण्याची आर्थिक परिस्थिती अनेकदा पालकांकडे नसते. अशा वेळी राज्य सरकारने या मुलांचे पालकत्व स्वीकारायला हवे, असेही न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला धोरण ठरवण्याचे निर्देश देत यासंदर्भातील पुढील सुनावणी 8 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. 20 आठवड्याहून अधिक दिवसांच्या गर्भवती असलेल्या परंतु जीवाला धोका असल्यामुळे गर्भपात करण्याची मागणी करणाऱ्या तीन नव्या याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनाक यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भपाताची परवानगी महिलांना देण्यात आलेली आहे. यापुढील कालावधीसाठी हायकोर्टाकडून परवानगी मिळणे सक्तीचे आहे. मात्र हल्ली अशा प्रकारच्या याचिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकतर आईच्या आणि गर्भाच्या जीवाला धोका असल्याचे कारण या याचिकांमध्ये असते किंवा गरोदर महिलेचं मानसिक आरोग्य अस्वस्थ होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आलेली असते. त्यामुळे अशा याचिकांबाबत ठोस नियमावली तयार करणे गरजेचे आहे, असं मत यावेळी हायकोर्टाने व्यक्त केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gurugram DLF Society Wife Case: भिंतीवर चढून हसत हसत म्हणाली, 'जर मी पडलो तर तू मला वाचवशील का?' अन् चौथ्या मजल्यावर लटकली; नवऱ्यानं दोन मिनिटे धरून ठेवलं, नंतर निसटून थेट रस्त्यावर
भिंतीवर चढून हसत हसत म्हणाली, 'जर मी पडलो तर तू मला वाचवशील का?' अन् चौथ्या मजल्यावर लटकली; नवऱ्यानं दोन मिनिटे धरून ठेवलं, नंतर निसटून थेट रस्त्यावर
Girish Mahajan on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मुलाखत येताच गिरीश महाजनांचा पुन्हा खळबळजनक दावा; म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार...
उद्धव ठाकरेंची मुलाखत येताच गिरीश महाजनांचा पुन्हा खळबळजनक दावा; म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार...
दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांची डिमांड,  मुंबईत धक्कादायक घटना
दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांच खंडणीची डिमांड, मुंबईत धक्कादायक घटना
Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?
रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gurugram DLF Society Wife Case: भिंतीवर चढून हसत हसत म्हणाली, 'जर मी पडलो तर तू मला वाचवशील का?' अन् चौथ्या मजल्यावर लटकली; नवऱ्यानं दोन मिनिटे धरून ठेवलं, नंतर निसटून थेट रस्त्यावर
भिंतीवर चढून हसत हसत म्हणाली, 'जर मी पडलो तर तू मला वाचवशील का?' अन् चौथ्या मजल्यावर लटकली; नवऱ्यानं दोन मिनिटे धरून ठेवलं, नंतर निसटून थेट रस्त्यावर
Girish Mahajan on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मुलाखत येताच गिरीश महाजनांचा पुन्हा खळबळजनक दावा; म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार...
उद्धव ठाकरेंची मुलाखत येताच गिरीश महाजनांचा पुन्हा खळबळजनक दावा; म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार...
दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांची डिमांड,  मुंबईत धक्कादायक घटना
दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांच खंडणीची डिमांड, मुंबईत धक्कादायक घटना
Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?
रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?
SIP : एसआयपीद्वारे 10 वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी कसा जमा करायचा? जाणून घ्या कसं?
SIP द्वारे गुंतवणूक सुरु केल्यास 10 वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी कसा उभारायचा? जाणून घ्या
काही पाप केलं नाही, जाहिराती स्कीप करत होतो, दोन तीन सेकंद लागले, तुम्हाला जाहिरात येत नाही?; जंगली रमीच्या नादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा करताना दमछाक
काही पाप केलं नाही, जाहिराती स्कीप करत होतो, दोन तीन सेकंद लागले, तुम्हाला जाहिरात येत नाही?; जंगली रमीच्या नादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा करताना दमछाक
Mukesh Ambani: मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अबांनींच्या नावावर किती कंपन्या? एका दिवसाची कमाई किती? 
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अबांनींच्या नावावर किती कंपन्या? एका दिवसाची कमाई किती? 
मराठवाड्यात 104% सोयाबीन पेरण्या पूर्ण, राज्यभरात किती खरीप पेरण्या झाल्या? पीक पेरणी अहवाल सांगतो...
मराठवाड्यात 104% सोयाबीन पेरण्या पूर्ण, राज्यभरात किती खरीप पेरण्या झाल्या? पीक पेरणी अहवाल सांगतो...
Embed widget