एक्स्प्लोर

Dharavi Redevelopment : धारावीचा विकास होणार की थांबणार ? धारावीकरांच्या संरक्षणासाठी ठाकरे मैदानात

Dharavi Redevelopment : आता अदानी समूहाला या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने पक्के करून धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे मार्गी लागण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत .

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत मध्यवर्ती भागात असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी (Dharavi). गेल्या अनेक वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास (Dharavi Redevelopment) रखडला असून अखेर अदानी समूहाकडून (Adani Group) पुनर्विकास होणार आहे. मात्र या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाची मशाल पुन्हा एकदा पेटली आहे. 

धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. गेल्या 19 वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडलेला आहे. मात्र आता अदानी समूहाला या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने पक्के करून धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे मार्गी लागण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत . मात्र हा प्रकल्प अदानीला देण्यावरून सध्या काही राजकीय पक्षांकडून विरोध होतोय. काहींकडून समर्थन केले जातंय. यात धारावीकर मात्र या दोन्ही बाजूच्या बाजू ऐकल्यानंतर संभ्रमात आहे आणि फक्त धारावीचा विकास व्हावा अशी भावना प्रत्येक धारावीवासियांची आहे.

अदानी समूहाकडून पुनर्विकास होणार

उंबरठ्यापासून 20 पावलं चालत नाही तोपर्यंत समोर भिंत येईल एवढंच घर. खरं तर ‘घर’ फक्त इथल्या चार भींतीत राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगासाठी ती झोपडीच. आणि अशा काही मोजक्या नाही तर हजारो झोपड्या म्हणजे ‘धारावी’. याच धारावीचा आता अदानी समूहाकडून पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून आता या भागांमध्ये सर्वेक्षण करायला देखील सुरुवात झालीये.  मात्र हे होत असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्षांकडून याला कडाडून विरोध होत आहे. याप्रकरणी, अद्याप मोर्चाचा परवानगी मिळाली नसली तरीही धारावी बचाव आंदोलनावर  कार्यकर्ते ठाम आहेत. 

ठाकरे गटाचा विरोध

मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास 567 एकर वरती धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे. धारावीतल्या 60 हजारहून अधिक झोपड्यांमध्ये 10 लाख हून अधिक लोक राहतात. शिवाय, 13 हजारहून अधिक लेदर, मातीच्या वस्तू, टेक्स्टाईल, गारमेंट आणि शेकडो छोटी-मोठी विविध प्रकारचे लघुउद्योग धारावीत आहेत. मुंबईत धारावी मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे. धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तेरेच्या दिशेला मिठी नदी आहे. याच धारावीचा पुनर्विकास आता होणार आहे.मात्र होत असताना उद्धव ठाकरे गटाने आणि काही राजकीय पक्षांनी आता या विरोधात एक लढा उभारलाय.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता विरोध का?

ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्षाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता विरोध का होतोय या विषयी सविस्तर जाणून घेऊयात. घर देताना कोणतीही दोन कॅटेगरी असू नये.धारावीतील प्रत्येक झोपडपट्टी धारकाला 405 स्क्वेअर फुट चे घर द्यायला हवं. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये झोपड्यांचे पात्र आणि अपात्र निकष 1 जानेवारी 2000 सालचे आहेत. मात्र धारावीकरांची मागणी आहे नवीन लेटेस्ट सर्वे करण्यात यावा. धारावीतील पुनर्विकास प्रकल्पामध्ये लघुउद्योगधारकांसाठी धोरण स्पष्ट नाही. धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांना दहा किलोमीटरच्या परीक्षेमध्ये पुनर्वसन केलं जाईल मात्र त्यांनाही याच पुनर्विकास प्रकल्पामध्ये सामावून घ्यायला हवं.

घरातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी स्पष्ट तरतूद या विकास प्रकल्पत नाही,ती करावी. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रक्रियेमध्ये धारावीतील लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प होत असताना त्याचा सुरुवातीला विकास आराखडा जाहीर करावा. 100% पैकी 25% वर विकास करून बाकीची जागा काय करणार? अदानी समूहाकडून होणारे जबरदस्तीचे सर्वे होऊ नये, अशा मागण्या अग्रस्थानी आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांकडून सध्या या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला विरोध होतोय.  

राज्य सरकार व आगामी समूहाकडून धारावीचा पुनर्विकास होत असताना कोणतीही स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळेच धारावीच्या संरक्षणासाठी आणि धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्ष अदानी समूहाच्या वांद्रे येथील कार्यालयावर 3 वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढणार आहेत.

हेही वाचा :

Adar Poonawalla London Mansion : 'पुणेकर' अदर पुनावाला लंडनमध्ये मुकेश अंबानींपेक्षाही महागडं 'घर' खरेदी करणार! किती हजार कोटींमध्ये व्यवहार झाला?

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget