एक्स्प्लोर

मुंबईची दिल्ली होतेय का? दिवाळीतील आतषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील प्रदूषणात वाढ

Pollution : हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना महामारी आटोक्यात आली असली, तरी पावसाळय़ापासून दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.

Air Pollution : दिवाळी म्हंटलं की दिव्यांची रोषणाई आणि आतिषबाजीचा सण… मात्र, ह्याच आतिशबाजीमुळे मुंबईची दिल्ली होतेय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सव्वा कोटींहून अधिकचे फटके फोडण्यात आलेत. अशात फटाक्यांच्या आतिषबाजीचा परिणाम मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्तेवर झालाय. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात प्रदूषणात भर पडल्यचं समोर आले आहे.   दिवाळीमध्ये आतषबाजी केली जाते पण याच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहरगावांमध्येही वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘सफर’ या संस्थेने नोंदविले आहे.  

मागच्या वर्षी दिवाळीत पाऊस होताना बघायला मिळाला. त्यामुळे प्रदूषणात अधिक भर पडली नाही. मात्र, ह्या वर्षी नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला जात 300 च्या जवळ पोहोचला आहे. त्यासोबतच मुंबईतील बीकेसी, मलाड आणि माझगावमधील हवा गुणवत्ता स्तर देखील वाईट स्थितीत पोहचला आहे. पुण्यातील कोथरुड आणि भोसरी या भागतही तशीच काहीशी परिस्थिती होती. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई आणि पुण्यासारखी शहरांची दिल्लीसारखी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. 

लक्ष्मीपूजनादिवशी आणि त्यानंतर काही वेळ काय होती परिस्थिती?

मुंबईतील सरासरी एक्यूआय 145 वर होता, त्यात पीएम 2.5 प्रदुषकाची मात्रा अधिक होती.  
नवी मुंबईतील एक्यूआय तर थेट 300 पार बघायला मिळाला.  
पुण्यातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. भोसरीत एक्यूआय 316 , कोथरुडमध्ये 302, शिवाजीनगर 228 पर्यंत गेला होता.  

हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना महामारी आटोक्यात आली असली, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्याच्या हवेमुळे पुन्हा एकदा सर्दी-खोकल्याची साथ वाढण्याची भीती आहे. हवेची गुणवत्ता पातळी खालावल्यास श्वास घेण्यास अडचणी, दम लागण्यासारखे प्रकार होऊ शकतात. 
वाईट पातळीवर असताना जास्त काळ  घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते. 

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम 
50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक 
101 ते 200 एक्यूआय - मध्यम 
201 ते 300 एक्यूआय - खराब 
301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब 
401 ते 500 एक्यूआय - गंभीर 

मागील दोन दिवसात राज्यातील शहरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक कसा होता? 
मुंबई - 221 एक्यूआय 
पुणे - 122 एक्यूआय 
अमरावती - 150 एक्यूआय 
औरंगाबाद - 253 एक्यूआय 
चंद्रपूर - 246 एक्यूआय 
कल्याण - 163 एक्यूआय 
नागपूर - 198 एक्यूआय 
नाशिक - 143 एक्यूआय 
ठाणे - 192 एक्यूआय 

दिवसेंदिवस वायु प्रदूषणात मुंबई आणि आजूबाजूच्या परिस्थितीतही वाढ होत आहे. दुसरीकडे, खेळती हवा असलेल्या पुण्यातदेखील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषित झाली आहे. शहरांमधील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात मुंबईची दिल्ली होण्याआधी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही आतषबाजी करताना मर्यादा पाळायला हव्यात. दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी टाळायला हवी.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget